1. इतर बातम्या

असे राहील भरतीचे स्वरूप! राज्यात लवकरच 7 हजाराहून जास्त पदांची पोलीस भरती, गृह विभागाकडून अधिसूचना जारी

अनेक तरुण पोलीस भरती प्रक्रियेचे चातकासारखे वाट पाहत आहेत. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून ठाकरे सरकारने भरती संदर्भातली रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून मिळालेल्या माहितीनुसार

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
maharashtra police recruitment

maharashtra police recruitment

 अनेक तरुण पोलीस भरती प्रक्रियेचे चातकासारखे वाट पाहत आहेत. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून ठाकरे सरकारने  भरती संदर्भातली रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून मिळालेल्या माहितीनुसार

राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली असून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियम मध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदाच मैदानी चाचणी होणार असून या चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारास लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

 पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी अशी असेल

 पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात येणारी शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असणार आहे. यामध्ये

1- पुरुष उमेदवारसाठी- सोळाशे मीटर धावणे( 20 गुण), 100 मीटर धावणे  ( पंधरा गुण),  गोळा फेक( पंधरा गुण) असे पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे स्वरूप असेल.

नक्की वाचा:Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात लवकरच भरली जाणार 7 हजार पदे; पोलीस भरतीची तारीख जाहीर

2- महिला उमेदवार- 800 मीटर धावणे( 20 गुण),  100 मीटर धावणे( पंधरा गुण), गोळा फेक( पंधरा गुण) असे एकंदरीत महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे स्वरूप राहणार आहे.

3- त्यासोबतच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई( पुरुष ) पदासाठीच्या मैदानी चाचणी एकूण 100 गुणांची होणार असून यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी धावणे( 50 गुण),  100 मीटर धावणे( 25 गुण),  गोळा फेक( 25 गुण)एकूण 100 गुण असणार आहेत.

 लेखी परीक्षेचे स्वरूप

 मैदानी चाचणी मध्ये किमान50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असून अशा उमेदवार, संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांची लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

लेखी चाचणी मधील अभ्यासक्रमाचा विचार केला तर यामध्ये अंकगणित,जनरल नॉलेज व करंट अफेयर्स अर्थात चालू घडामोडी व बुद्धिमत्ता चाचणी तसेच मराठी व्याकरण या विषयांवर आधारित प्रश्न विचारलेले असतील व हे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील.

नक्की वाचा:1 जुलैपासून अग्नीवीरांच्या भरतीसाठी होणार ऑनलाईन नोंदणी, आठवी उत्तीर्ण झालेल्यांनाही अर्जाची मुभा

परीक्षेची भाषाही मराठी असूनवर्षाचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. या परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे.

या पेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. याबाबतीत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक पोलिस घटकासाठी गठीत केलेली निवड मंडळ शारीरिक व लेखी मध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रीकरण करून फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी तयार करतील.

नक्की वाचा:करियर वाटा: 'हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट' एक विद्यार्थ्यांसाठी ठरू शकतो फायदेशीर करिअरचा मार्ग, जाणून घ्या सविस्तर माहिती

English Summary: state goverment to take decision about more than 7 thousand recruitmment in police Published on: 28 June 2022, 09:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters