1. बातम्या

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे, कोरोना काळानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. यातच राज्य सरकाने नियमित कर्जफेड (crop loan) करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmer) द्याव्या लागणाऱ्या 50 हजारांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानासाठी १० हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे अनेकांनी सांगितले.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Sugarcane growers subsidy raju shetty

Sugarcane growers subsidy raju shetty

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे, कोरोना काळानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. यातच राज्य सरकाने नियमित कर्जफेड (crop loan) करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmer) द्याव्या लागणाऱ्या 50 हजारांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानासाठी १० हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे अनेकांनी सांगितले.

असे असताना मात्र यामध्ये विविध निकष लावून शेतकऱ्यांची जणू क्रूर चेष्टा केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत, पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदानाचा निर्णय येत्या (Punjabrao Deshmukh Interest Concession) आठवड्याभरात घ्या अन्यथा सरकार कोणाचेही येवो 13 जुलैला जिल्हाधिकारी (Kolhapur collector office) कार्यालयार विराट मोर्चा काढू, असे त्यांनी म्हटले आहे.

यामध्ये कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. मात्र, हे अनुदान देत असताना लावलेल्या अटींवरून राजू शेट्टी यांनी पोलखोल केली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

PM Kisan योजनेत मोठा बदल, आता मिळणार ४ हजार रुपये, 'ही' कागदपत्रे जमा करावी लागणार

या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे, पण ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सहकार आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात अनेक अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना महापुरात मदत मिळाली आहे, त्यांना हे अनुदान मिळणार नाही अस हे परिपत्रक सांगत आहे, यामुळे आता ते आक्रमक झाले आहेत.

संधीवातावर गुणकारी ठरतो कोबी, असा करा वापर, संधीवात जाईल पळून

ते म्हणाले, नियमित कर्ज भरणारे 95 टक्के शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, पण हेच शेतकरी या मध्ये पात्र होताना दिसत नाहीत. ऊस शेती ही 15 ते 18 महिन्याच पीक आहे. शासनाचा नियम असा आहे की सलग तीन वर्षे कर्ज काढल्यास या योजनेला पात्र राहील असे निकष आहेत मग 15 ते 18 महिने ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबत नियम कसा धरायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
महाराष्ट्रातील तरुणाने भरला राष्ट्रपती पदासाठी अर्ज, चर्चांना उधाण...
आसाममध्ये पुराचा हाहाकार! 50 लाख लोक बाधित, मंत्री मात्र ठेवत आहेत बंडखोर आमदारांवर लक्ष
एकीकडे आमदार फरार मात्र हा आमदार थेट पेरणीच्या औतावर, फोटो व्हायरल

English Summary: Sugarcane growers will not get Rs 50,000 subsidy? Onerous terms in the plan Published on: 28 June 2022, 10:31 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters