1. कृषीपीडिया

कुतूहल - जमीन सुपीक आहे, असे कधी म्हणता येते?

पिकांचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कुतूहल - जमीन सुपीक आहे, असे कधी म्हणता येते?

कुतूहल - जमीन सुपीक आहे, असे कधी म्हणता येते?

पिकांचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात.ही अन्नद्रव्ये धारण करण्याच्या जमिनीच्या क्षमतेला जमिनीची सुपिकता म्हणतात. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता समजते.जमिनीचा कस हा तिच्या सुपिकतेचा एक भाग आहे.पुष्कळ वेळा जमिनी सकस असूनही त्या सुपीक असतातच असे नाही.पिकांचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात. ही अन्नद्रव्ये धारण करण्याच्या जमिनीच्या क्षमतेला जमिनीची सुपिकता म्हणतात. 

माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता समजते. जमिनीचा कस हा तिच्या सुपिकतेचा एक भाग आहे. पुष्कळ वेळा जमिनी सकस असूनही त्या सुपीक असतातच असे नाही. परंतु सुपीक जमिनी मात्र निश्चितच कसदार असतात.जमिनीची सुपिकता ही तिच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर तसेच मशागतीच्या पद्धतींवर अवलंबून असते. ज्या खडकापासून जमीन तयार झाली, त्या खडकात भरपूर खनिजे असल्यास त्यापासून सुपीक जमीन तयार होते.आयन विनिमयामुळे पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.मॉन्टमोरिलोनाइट खनिजाची आयन विनिमय शक्ती जास्त असते. हे खनिज मातीत असल्यास जमिनीची सुपिकता वाढते.

अतिपावसाच्या प्रदेशात जमिनीतील अन्नद्रव्ये वाहून गेल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. गवताळ आणि थंड कटिबंधातील जमिनीत भरपूर सेंद्रीय पदार्थ असल्याने त्या प्रदेशातील जमिनी सुपीक असतात.उष्ण कटिबंधातील कमी पावसाच्या भागात सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण कमी असते. या प्रदेशातील जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे विघटन झपाटय़ाने होते. म्हणून जमिनी लवकर नापीक होतात. जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण दोन ते तीन टक्के असते. टेकडय़ांच्या उतारावरील जमिनी कमी सुपीक असतात. अशा जमिनीत गाळाबरोबर वाहून आलेली अन्नद्रव्ये गोळा होतात व साठतात.जमिनीच्या सुपिकतेच्या घटकांमध्ये मातीची जोपासना, सेंद्रीय व रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर,

पाणी व जमीन व्यवस्थापन, योग्य मशागत, पिकांची योग्य फेरपालट,रोग व किडींचा योग्य बंदोबस्त यांचा समावेश होतो.जमिनीतील सेंद्रीय द्रव्यांमुळे जमिनीची घडण,निचरा शक्ती,आयन विनिमय शक्ती सुधारते आणि जमिनी सुपीक बनतात.शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी जमिनीत ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, ती अन्नद्रव्ये आवश्यक त्या प्रमाणात घालून त्याची योग्य पातळी राखावी. जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रीय आणि रासायनिक खते घालून जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक घडण सुधारून घ्यावी आणि द्विदल पिकांची योग्य प्रमाणात फेरपालट करावी.

 

- डॉ.जनार्दन कदम, वृषाली देशमुख (सोलापूर) मराठी विज्ञान परिषद, 

English Summary: Curiosity - When can it be said that land is fertile? Published on: 12 June 2022, 08:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters