1. बातम्या

साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोदी सरकारने साखर निर्यात बंदीचा निर्णय नुकताच जाहीर केला. यामुळे आता यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. असे असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जर असा निर्णय झाला तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा असेल.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Raju Shetty's first reaction to the decision to ban sugar exports

Raju Shetty's first reaction to the decision to ban sugar exports

मोदी सरकारने साखर निर्यात बंदीचा निर्णय नुकताच जाहीर केला. यामुळे आता यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. असे असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जर असा निर्णय झाला तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा असेल.

राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचा फटका गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच कांदा १ रूपया प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जात आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.

यामुळे साखर निर्यात बंदीचा निर्णय देखील शेतकऱ्यांना तोटा सहन करणारा असेल असेही ते म्हणाले. राज्यात अजून अनेक शेतकऱ्यांचा ऊस गळपाविना तसाच आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच पुढील वर्षीच्या निर्यातीचे आतंरराष्ट्रीय बाजारातील करार न झाल्यास साखर उद्योगावर गंभीर परिणाम होतील.

शेतकऱ्यांना खतासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत, मोदी सरकारने केली शेतकऱ्यांच्या हिताची घोषणा

यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय अतिशय मुर्खपणाचा असून देशातील साखर उद्योगाला खड्ड्यात घालणारा आहे. दिल्लीत अति शहाण्या लोकांना याचा विचार करून निर्णय घ्यावा. केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तातडीने साखर निर्यातीचे धोरण राबवावे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

'साखर निर्यात बंदीचा निर्णय मुर्खपणाचा, दिल्लीत अति शहाण्या लोकांनी याचा विचार करून निर्णय घ्यावा'

यामुळे देशातील शेतकरी व साखर उद्योग खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. यामुळे याकडे गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी अतिरिक्त उसामुळे अडचणीत आला आहे. अनेकांचे ऊस मे महिना संपत आला तरी अजूनही तोडले गेले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या;
जगातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, प्रत्येकाच्या खात्यावर आहेत १५ लाख रुपये, वाचा श्रीमंतीचे कारण...
सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत
जुन्नरच्या हापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! GI मानांकनाबाबत शरद पवारांकडून आश्वासन

English Summary: Raju Shetty's first reaction to the decision to ban sugar exports, said ... Published on: 26 May 2022, 02:17 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters