1. बातम्या

लॉकडाऊनबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, कोरोना रुग्णसंख्या वाढली

गेल्या काही दिवसांपासून कोविड प्रकरणे वाढत राहिल्यास, सरकारला निर्बंधांबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागतील. राज्यात काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.

corona patient number increased

corona patient number increased

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोना अचानक वाढू लागला आहे. यामुळे चिंता वाढू लागली आहे. यामुळे आता कोविड प्रकरणे वाढत राहिल्यास, सरकारला निर्बंधांबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागतील. राज्यात काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाशी पुरेसा सल्लामसलत केल्यानंतरच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये किंवा नवीन निर्बंधांमध्ये बदल करण्याचा विचार केला जाईल. यामुळे महाराष्ट्र सरकारला काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यावर लक्ष ठेवावे लागेल, असेही अजित पवारांनी सांगितले आहे. यामुळे पुढील काही दिवस महत्वाचे असणार आहेत. काल तीन महिन्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला. यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

बीजिंग आणि शांघायसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याठिकाणी प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर लोकांना घरीच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. यामुळे जगभरात देखील अजूनही कोरोना असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाता मास्तका वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आता आठच दिवसात लठ्ठपणा कमी करा, संशोधनानंतर वजन कमी करणारांसाठी आनंदाची बातमी

तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महाराष्ट्रात दररोज कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे हजाराहून अधिक झाल्यास पुन्हा निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आता काही दिवसात परिस्थिती बघून निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

यंदा 42 हजार कोटींची एफआरपी FRP, विक्रमी गाळपामुळे विक्रमी वाढ

टोपे यांनी मत व्यक्त केले की प्रकरणांमध्ये वाढ टाळण्यासाठी मास्क घालणे आणि सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. परिस्थिती फारशी चिंताजनक नाही, परंतु त्याच वेळी ते सर्वांना सतर्क राहिले पाहिजे. मार्गदर्शक तत्त्वे नसतानाही, नागरिकांनी स्वयं-सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे पुढील काळात पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार नाही, जर रुग्णसंख्या वाढली तर मात्र निर्णय घेतला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या;
IoTech World Avigation कंपनीने लॉन्च केला सर्वोत्तम बाइक ड्रोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत
लाव वशिला! सरपंचाने केले स्वतःच्या मुलाला ग्रामपंचायतीचा शिपाई, जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता...
'बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम'

English Summary: Ajit Pawar's statement lockdown, corona patient number increased Published on: 31 May 2022, 02:00 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters