![humani insect](https://kjmarathi.b-cdn.net/media/13964/h.jpg)
humani insect
हुमनी ही एक अतिशय नुकसानकारक बहुभाक्षिक कीड आहे. ही अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळ्या कुरतडते.त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
खरीप हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, कापूस, बाजरी, मका आणि तूर पिकावर हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते.
रब्बी हंगामामध्ये पेरणी झाल्यानंतर या पिकाच्या उगवणीनंतर हुमणीच्या अळ्या हरभरा, करडई आणि ज्वारी इत्यादी पिकाच्या मुळा खाण्याची शक्यता असते रोपावस्थेत मुळकु रखडल्यामुळे संपूर्ण रोप जळून जाते. हुमनी आळी ची अवस्था पाहिली तर ती जुलै ते नोव्हेंबर तसेच डिसेंबर पर्यंत असते. म्हणून हुमणीच्या आळी पासून होणारे सद्यपरिस्थिती नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात खालील प्रमाणे हुमणीचे व्यवस्थापन करावे.
रब्बी हंगामात हुमणी अळी चे एकात्मिक व्यवस्थापन….
- ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घ्यायचा नाही त्यांनी पीककाढणीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी व पाळी मारावी. त्यामुळे जमिनीतील ओलावा पृष्ठभागावर आल्यानंतर सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचुन खाल्ल्यामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होते.
- पिकांमध्ये शक्य असेल तर आंतरमशागत करावी व उघड्या पडलेल्या अळ्या हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून मारून टाकावे.
- पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
- रब्बी पिकांची पेरणी करताना फोरेट दहा टक्के दाणेदार 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे व जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे.
- हुमणीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम एनिसॉपलियाउपयुक्त बुरशीचा दहा किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ती
- पुरेशी हुमणीच्या अळ्यांना रोगग्रस्त करते त्यामुळे यांचा बंदोबस्त होतो.
- अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमींचा वापर करावा.
- फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के हे मिश्रण कीटकनाशक चार ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून ऊस या पिकाच्या झाडाभोवती आळवणी करावी.
- सदर उपाय योजना केवळ सद्य परिस्थिती साठी पिकांच्या हुमनी आळी पासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी आहेत.
- या किडीचे संपूर्णपणे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिक रीत्या दोन ते तीन वर्ष प्रौढ व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
- खरीप हंगामात मृगाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगे कडूलिंब, बाभूळ, बोर इत्यादी झाडांच्या पानांवर रात्रीच्यावेळी निवारा करत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मिळून सामूहिक रीत्या बंदोबस्त करावा व त्यासाठी प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा.
Share your comments