1. फलोत्पादन

निसर्गाच्या लहरीपणाचा अंतिम टप्प्यात पिकांना फटका; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकनाचूर

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकणातील फळपिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

निर्सगाच्या लहरीपणाचा अंतिम टप्यात पिकांना फटका

निर्सगाच्या लहरीपणाचा अंतिम टप्यात पिकांना फटका

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकणातील (North Maharashtra and Konkan) फळपिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे (Hail) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी पाऊस झाल्यामुळे गहू, ज्वारी, आंबा (Wheat, sorghum, mango) पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचवेळी परिसरातील शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

Central Government : अतिरिक्त खताच्या वापराबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे सर्वच धुळीचे लोटले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी
तालुक्यातील आगळगाव, उंबरगे, काटेगाव, भानसाळे, खडकोणी, मांडेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वरुण राजाने चांगलीच हजेरी लावली आहे. आंब्याची लागवडही मोठ्या प्रमाणावर झाली असून, नाशिक आणि कोकणातील शेतकऱ्यांचेही तेच चित्र आहे.

सरकार शेतकऱ्यांना देणार तीन हजार रुपये महिना; लवकर नोंदणी करा आणि घ्या लाभ

उत्तर बार्शी परिसरात ज्वारी हे मुख्य पीक आहे. सध्या ज्वारी काढणीला सुरुवात झाली असून अचानक आलेल्या पावसाने ज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडल्यास ज्वारी काळी पडते आणि त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

जनावरांचा चारा महागणार; ज्वारी पेक्षा कडब्याला मागणी

English Summary: Crops hit the final stage of nature's whimsy Published on: 14 April 2022, 05:54 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters