1. सरकारी योजना

Kvp Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत करा गुंतवणूक आणि करा पैसे दुप्पट,वाचा या योजनेविषयी सविस्तर माहिती

गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे आणि केलेल्या गुंतवणुकीचा परतावा चांगला कसा येईल अशा योजनांच्या व पर्यायांच्या शोधात बरेचजण असतात. आपल्या कष्टाने केलेली बचत सुरक्षित रहावी यासाठी बरेच जण पोस्ट खात्याचा देखील पर्याय निवडतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kisan vikas patra scheme

kisan vikas patra scheme

गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे आणि केलेल्या गुंतवणुकीचा परतावा चांगला कसा येईल अशा योजनांच्या व पर्यायांच्या शोधात बरेचजण असतात. आपल्या कष्टाने केलेली बचत सुरक्षित रहावी यासाठी बरेच जण पोस्ट खात्याचा देखील पर्याय निवडतात.

कारण पोस्ट विभागाकडून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजना सादर केलेल्या आहेत. त्यातीलच एक पोस्ट खात्याची महत्त्वपूर्ण आणि चांगला परतावा देणारी योजना असून या योजनेचे नाव आहे

"किसान विकास पत्र" हे होय. छोट्या बचत योजनेअंतर्गत ही योजना चांगली आहे. कुठलेही प्रौढ भारतीय नागरिक या योजनेत आपले खाते उघडू शकतात.

या योजनेत तीन लोकांच्या नावाने संयुक्त खाते देखील उघडण्याची सोय आहे. पोस्ट खात्याच्या असलेल्या गुंतवणूक योजनांपैकी ही योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे.

नक्की वाचा:Lic Scheme: एलआयसीच्या या योजनेतुन दरमहा मिळणार 12 हजार, वाचा डिटेल्स

 किती आहे या योजनेचा व्याजदर?

 आपल्याला माहित आहेच की स्मॉल सेविंग स्कीम अंतर्गत असलेले व्याजदर हे दर तीन महिन्यांनी किंवा तीन महिन्याच्या आधारावर निश्चित केले जातात.

परंतु या वेळेस 30 जून 2022 रोजी सरकारने किसान विकास पत्र या योजनेच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही.

सध्या या योजनेवर वार्षिक 6.9 टक्के व्याजदर दिला जातो. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.

आपली गुंतवणूक दुप्पट करण्याचा उद्देश मनात ठेवून बरेच लोक या योजनेचा पुरेपूर लाभ घेत आहेत. या योजनेच्या अंतर्गत 124 महिन्यात म्हणजेच दहा वर्ष चार महिन्यात तुमचे रक्कम दुप्पट होते.

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टाच्या योजनेत 50 रुपये गुंतवा, तब्बल 35 लाख मिळणार

विशेष म्हणजे किसान विकास पत्र योजना आयकर कायदा 80 सी अंतर्गत येत नाही त्यामुळे जो काही परतावा मिळेल त्यावर कर भरावा लागेल मात्र या योजनेत टिडिएस कापला जात नाही.

या योजनेत तुम्हाला पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्डचा तपशिल द्यावा लागतो.

या योजनेत खाते उघडण्यासाठी ची पात्रता

 दहा वर्ष पेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत खाते उघडू शकते. परंतु यासाठी एक अट अशी आहे की वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीखाली खाते अपडेट करावे लागते.

दुसरी गोष्ट म्हणजे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती दोन किंवा तीन व्यक्तींसह संयुक्त खाते उघडू शकतात.

नक्की वाचा:"पेरणीसाठी कर्ज द्या, नाहीतर सावकाराकडे शेती गहाण ठेवावी लागेल"

English Summary: kisan vikas patra sche is so benificial for investment and give good return Published on: 07 July 2022, 12:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters