1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांना हीच भूमिका ठरते आहे मारक, याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

माझे आजोबा शेती करायचे. माझे वडीलही अन आता मी पण शेती करतोय

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांना हीच भूमिका ठरते आहे मारक, याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

शेतकऱ्यांना हीच भूमिका ठरते आहे मारक, याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

शेतीत खूप बदल झालाय हे जरी काही अंशी खर असलं तरी शेतकऱ्याच्या मानसिकतेत काहीही बदल झालेला नाही हे वास्तव आहे.ऐकवेळ आम्ही जातीच्या.पक्षाच्या नेत्याच्या..नेत्याच्या मुलाच्या..नावानं एकत्र येऊ पण शेतीच्या नाहीच आणि हीच मानसिकता शेतकऱ्यांच्या विकासाला मारक व लुटिला पोषक आहे.पूर्वजांनी निमुटपणानं लूट.अन्याय सहन केला कारण ते अशिक्षित होते पन आजचा तरुण शेतकरी शिक्षित आहे उच्चशिक्षित आहे तरीही त्याची भूमिका फक्त बघ्याची आणि लाचारीनं सहन करण्याची असेल तर ही लाजवाणी गोष्ट आहे.आपलं हित दुसरा कुणी करेल..आपल्यासाठी दुसरा कुणी लढेल..

संघर्ष करेल नं मी मात्र सोयिस्कर या संघर्षपासून दूर असेल हे निव्वळ षंडपणाचे लक्षण आहे. व्यवस्था परिवर्तनाची ताकद फक्त शेतकरी आणि कामगार यांच्यात आहे..इतिहास साक्षी आहे ज्या ज्या वेळेस जगात कुठल्याही देशात क्रांती झाली असेल तर त्याची मशाल या दोन घटकांच्याच हातात होती..मदमस्त भांडवलदार आणि स्वार्थी राजकारणी कधीही व्यवस्था परिवर्तन घडवू इच्छित नसतात कारण ते त्यांच्या नफेखोर प्रवृत्तिला मारक असते. जो-जो शेतीच्या प्रश्नाविषयी आवाज उठवेल.संघर्ष करेल..त्याला तन- मन- धनानं साथ देण ही शेतकरी म्हणून आपली प्रार्थमिकता असली पाहिजे.

जिथे जिथे लुटीची व्यवस्था लक्षात येईल तिथे तिथे त्या व्यवस्थेविरुद्ध स्वता संघर्ष करायला हवा अन जर दुसरा कुणी संघर्ष करत असेल तर आपली काम थोड़ी बाजूला ठेवून त्याला प्रत्यक्ष साथ दिली पाहिजे.आपली परावलंबी व् निमुटपनानं सहन करण्याची.संघर्ष नं करता फक्त बघ्याची भूमिका आपल नुकसान तर करतेच आहे परन्तु पुढच्या पिढीला ही आपन फक्त बघे आणि षंड बनवत आहोत..शेतीत कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थित संघर्ष करण्याची ज़िद्द असलेला शेतकरी या लुटीच्या व्यवस्थेबरोबर ही तितक्याच जिद्दी नं अन ताकदीने संघर्ष करू शकतो

हे दाखवून दयायला हव अन त्यासाठी गावोगावी तरुण शेतकऱ्यांनी पक्ष.जाती विरहित एकत्र यायला हव तरच काही परिवर्तन घडू शकते अन्यथा नाहीच.आपलं हित दुसरा कुणी करेल.आपल्यासाठी दुसरा कुणी लढेल.. संघर्ष करेल नं मी मात्र सोयिस्कर या संघर्षपासून दूर असेल हे निव्वळ षंडपणाचे लक्षण आहे. व्यवस्था परिवर्तनाची ताकद फक्त शेतकरी आणि कामगार यांच्यात आहे.इतिहास साक्षी आहे ज्या ज्या वेळेस जगात कुठल्याही देशात क्रांती झाली असेल तर त्याची मशाल या दोन घटकांच्याच हातात होती..मदमस्त भांडवलदार आणि स्वार्थी राजकारणी कधीही व्यवस्था परिवर्तन घडवू इच्छित नसतात कारण ते त्यांच्या नफेखोर प्रवृत्तिला मारक असते.

English Summary: This is the role that farmers are facing, which farmers need to pay serious attention to Published on: 28 May 2022, 02:55 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters