1. कृषीपीडिया

सॉईल सोलरायझेशन! जमीन नांगरून चांगली तापू देणे पिक उत्पादन वाढीसाठी आहे महत्त्वाचे

भारतात परंपरेने खरीप किंवा रब्बी पीक घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टर किंवा बैल नांगराने एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soil plowing is so important to control insect and more production

soil plowing is so important to control insect and more production

 भारतात परंपरेने खरीप किंवा रब्बी पीक घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टर किंवा बैल नांगराने एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते.

उन्हाळ्यात 35 सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान गेले की 15 सेमी खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते.

 अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोषअवस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रिकल  कण्डक्टिविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची घनता वाढते. आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते.

 सूर्यप्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. इतर बाबींमध्ये पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्‍यक असते. कारण त्याशिवाय मुळाची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहुन जातो,ओल खोल पर्यंत जात नाही.नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते, त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो.

 जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना सहज उपलब्ध होतात. पृथ्वीच पोट ( भूगर्भ )हे एक बँकेच खात आहे. ज्यात लक्षावधी वर्षाची पाण्याची झालेली बचत साठवलेली होती. अगदी पिढ्यानपिढ्या साठत आलेली बचत.

 जमिनीवर असलेलं पाणी जसं की पाऊस, नदी, सरोवर, ही तुमची कमाई आहे. त्यातला 35 टक्के वाटा सूर्य नावाचं आयकर खात कापून घेत. तेच पुढे पावसाच्या रूपाने पगारा सारखं परत येत. त्यातला काही भाग भूगर्भातील बचत खात्यात जमा होतो. तर बराचसा भाग तुम्ही खर्च करता. आता खाणारी तोंड वाढली (लोकसंख्या). उधळपट्टी वाढली(वॉटर थीम पार्क, तरण तलाव, आस्थापन सर्विस सेंटर इ.) तसं तुम्ही बचत खातं पण बुडीत काढायला निघालात. त्या खात्या मुळे इतर जे व्याज म्हणून मिळणारे फायदे होते.(वन, संपदा, तापमान, नियंत्रण ) ते ही झपाट्याने कमी होऊ लागले.

पाऊस दरवर्षी पडतो. पण आपल्याला सवय काय? तर… पगार झाला की पंधरा वीस दिवस मजा मारायची. शेवटचे आठ-दहा दिवस भणगांसारखं उधारी उसनवार करत फिरायचं. तेव्हा नारे द्यायचे "पाणी" वाचवा तीच परिस्थिती आताही आहे. जागतिक हवामान बदलामुळे पगार ( पाऊस ) वेळेवर व पुरेसा होईनासा झालाय. आपल्या उधळपट्टीला आवर नाही.

त्यात शुद्ध पाण्याच्या जलचक्रात ( पाऊस -बाष्पीभवन -पाऊस ) आपण गटार व सांडपाणी नावाचं एक वाईट कर्ज वाढवत नेतोय. थोडक्यात पाण्याच्या बाबतीत आपला लवकरच 'विजय माल्या' होणार आहे. तो देश सोडून पळाला. आपण पृथ्वी सोडून कुठे पळणार आहोत.( संदर्भस्त्रोत-कृषिवर्ल्ड)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:ऐकावे ते नवलंच! मॅकडोनाल्डमध्ये जेवणासाठी 'ही' कंपनी देणार तब्बल 1 लाख रुपये पगार; वाचा काय आहे 'हा' माजरा

नक्की वाचा:असनी चक्रीवादळाने 24 तासांत आपला मार्ग बदलला, राज्यात रेड अलर्टनंतर आज होणारी इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलली

English Summary: soil plowing is so important to control insect and more production Published on: 11 May 2022, 09:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters