1. कृषीपीडिया

हे बनवा मृदा अमृत चिंतला रेड्डीसरांच टेक्निक (CVR PROCESS)

श्री. चिंतला वेंकट रेड्डी यांच्याद्वारे संशोधित पर्यावरण पूरक पद्धती ज्यामधे रासायनिक खते अथवा किटकनाशकांच्या वापराशिवाय पिकास पोषण व संरक्षण पुरविण्याची क्षमता आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हे बनवा मृदा अमृत चिंतला रेड्डीसरांच टेक्निक (CVR PROCESS)

हे बनवा मृदा अमृत चिंतला रेड्डीसरांच टेक्निक (CVR PROCESS)

श्री. चिंतला वेंकट रेड्डी यांच्याद्वारे संशोधित पर्यावरण पूरक पद्धती ज्यामधे रासायनिक खते अथवा किटकनाशकांच्या वापराशिवाय पिकास पोषण व संरक्षण पुरविण्याची क्षमता आहे. या अल्पखर्चिक अद्भुत संशोधनात आपल्याच शेतातील पृष्ठभागावरील व थोड्याश्या खोलीवरील सुक्या मातीचा वापर करून पिकास कीड व रोगराई पासून संरक्षण व अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जाऊ शकतो. श्री. रेड्डी हे हैदराबाद स्थित प्रयोगशील शेतकरी आहेत. गेली अनेक वर्षे ते या पद्धतीचा वापर व यावर अधिक संशोधन करत आहेत. त्यांनी या पद्धतीचे पेटंटही मिळवले आहे.

 

 साहित्य 

जमीनीच्या पृष्ठभागावरील २ इंचापर्यंतची १५ किलो माती.(Top Soil) 

जमीनीच्या पृष्ठभागाखालील १ ते ४ फुट खोलीवरील १५ किलो माती. (Sub Soil) ( ही माती शक्यतो कडक उन्हाळ्याच्या काळात खणून काढावी)

दोन्ही प्रकारची माती उन्हात वाळवून घ्यावी. त्यामधे आर्द्रता अजिबात शिल्लक नाही याची खातरजमा करावी.

माती आपल्याच शेतातील असावी

२०० लिटर पाण्यासाठी हे प्रमाण आहे. आपल्या गरजेनुसार सर्वच साहित्य प्रमाणबद्ध कमी/जास्त करावे.

 कसे बनवावे 

दोन्ही माती २०० लिटरच्या ड्रम मधे टाकून तो पाण्याने पूर्ण भरावा. माती पाण्यात व्यवस्थित विरघळेल इतपत पाणी काठीने ढवळावे. यानंतर पाणी स्थिर होऊ द्यावे. ३० मिनीटांमधे मातीतील तरंगणारे घटक पाण्याच्या तळाशी बसतील. वरच्या थरातीळ गढूळ पाणी कापडाने अथवा गाळणीने गाळून घ्यावे. 

कसे वापरावे 

गाळलेले पाणी लगेचच अथवा चार तासांच्या आत पिकावर उपलब्ध साधनांच्या मदतीने फवारावे. फवारणीसाठी साधन उपलब्ध नसल्यास हाताने शिंपडावे. (२०० लिटरच्या ड्रममधे बनविलेल्या पाण्यापासून वरच्या थरातील अंदाजे १६० लिटर पाणी फवारणीसाठी उपलब्ध होते)

अशा प्रकारे पिकास फवारणी दर ७ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.

उरलेला गाळ झाडांना अथवा पिकास जमीनीद्वारे द्यावा.

खोल जमीनीत जिथपर्यंत पिकांचि मुळे जात नाहीत अशा मातीत अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात असतात. जसजसे खोल जावे तसतसे हे प्रमाण वाढत जाते. जमीनीच्या पृष्ठभागावरील मातीत वायवीय (aerobic) व अवायवीय (anaerobic) सूक्ष्मजीवांचे प्रमाण अधिक असते. या जिवाणूंच्या मदतीने पाण्याच्या संपर्कात खोल मातीतील अन्नद्रव्ये पाण्यात विरघळली जातात व पिकास सहजगत्या उपलब्ध होतात.

 

 फायदे 

या पद्धतीने पिकास जमिनीतून दिल्या जाणाऱ्या निविष्ठांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात मातीचा वापर करून थेट व त्वरित अन्नद्रव्ये पुरविली जातात.

झाडांची व पिकाची वाढ मजबूत होते.

फळे व धान्याच्या उत्पादनात वाढ होते.

पिकास रोगराई व किडिंचा उपद्रव होत नाही.

उत्पादित फळे व धान्याचा दर्जा, चव व पोषक तत्वे यामधे लक्षणीय वाढ दिसून येते.

यापकारे पिकवलेल्या भात व गहू या पिकामधे विटॅमिन A व C ची मात्रा अधिक आहे.

महत्वाचे 

हिवाळ्यात किंवा थंड प्रदेशात जेंव्हा दिवसा तापमान ३० डिग्री सें. व रात्री २० डिग्री सें. इतके किंवा यापेक्षा कमी असते, अशा काळात हे मिश्रण तयार करताना त्यात २ किलो गायीचे ताजे शेण व २ ते ५ लिटर गोमूत्र मिसळल्यास उत्तम परीणाम मिळू शकतात.

दोन्ही प्रकारच्या माती वाळवून साठवण करताना एखाद्या खोलीत अथवा ताडपत्रीने (टारपोलिन) झाकून वेगवेगळी ठेवावी. 

द्रावण तयार करण्या अगोदर पाणी अथवा आर्द्रतेचा संपर्क होऊ देऊ नये.

 

श्री. चिंतला वेंकट रेड्डी यांच्या कृतीचा मराठी अनुवाद

नैसर्गिक शेती समूह, महाराष्ट्र

जावेद इनामदार, श्रीरामपूर

9225332032

English Summary: Make this soil amrut reddi sir techniques Published on: 17 January 2022, 09:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters