1. कृषीपीडिया

एप्रिल महिन्यात करा या पिकांची लागवड होईल बक्कळ पैसा

शेतकऱ्यांनी एप्रिल मध्ये या पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल त्यांना त्या पिकातून आधीचा फायदा मिळेल

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
एप्रिल महिन्यात करा या पिकांची लागवड होईल बक्कळ पैसा

एप्रिल महिन्यात करा या पिकांची लागवड होईल बक्कळ पैसा

एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरु झालेला आहे, या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल त्यांना त्या पिकातून आधीचा फायदा मिळेल ती कोणती पिके आहेत हे आपण जाणून घेऊयात.

शेतकऱनी हंगामानुसार आणि योग्य नियोजन करून जर पिकांची निवड केली तर निश्चितच त्यांना फायदा मिळणार आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊक आहे की, एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांची काढणी उरकून घेतात आणि आगामी उन्हाळी हंगामासाठी तयारी करतात.

मात्र यादरम्यान शेतकरी बांधवाकडे सुमारे दोन महिन्यांचा कालावधी असतो, अर्थात शेतकरी बांधवांचे शेत सुमारे दोन महिने रिकामे असते. 

अशा परिस्थितीत या रिकाम्या शेतात शेतकरी बांधव अनेक गोष्टींची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.

एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असेल त्यांनी मुगाची लागवड (Cultivation of Kidney Bean) करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात. मूग (Green Gram) हे पीक अल्प कालावधीतच काढणीसाठी तयार होत असते.

या पिकाला काढणीसाठी 60 ते 67 दिवस लागतात. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड केल्याने जमिनीची सुपीकता वाढते. 

यामुळे या पिकाची लागवड करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देखील देत असतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांची इच्छा असेल तर शेतकरी बांधव त्यांची जमीन अधिक मजबूत करण्यासाठी उडीद, चवळी किंवा मूग इत्यादी पिके लागवड करू शकतात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, त्याचा वापर हिरवळीचे खत बनवण्यासाठी होतो.

ज्या शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम (Rabbi Crop) आणि उन्हाळी हंगाम या दरम्यान असलेल्या काळात शेत ओसाड न पडू देता शेती करायची असेलतर ते शेतकरी संपूर्ण एप्रिलमध्ये मक्याच्या साठी या वाणाची लागवड करू शकतात.

शेतकरी बांधव एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भुईमुगाची पेरणी (Peanut Farming) देखील करू शकता, या पिकातून देखील शेतकरी बांधवांना लवकरच चांगला नफा मिळणार.

शेतकऱ्यांनी पिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिरवळीचे खत हे आजकाल अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याची अत्यंत गरज आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी स्वत:च्या शेतात हिरवळीचे खत तयार केल्यास त्यांना ते बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही, त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. निश्चितच एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात रिकाम्या पडलेल्या शेताचा फायदा घेत शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात.

English Summary: In April month take this crop and give more money Published on: 16 April 2022, 05:14 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters