1. कृषीपीडिया

बाटलीबंद नारळ पाण्याची निर्यात अन नारळापासून इतर उत्पादने देत आहेत नारळ शेतीतून चांगले उत्पन्न

नारळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नारळ हे एक आरोग्यदायी साठी खूपच फायदेशीर असून त्यामध्ये असलेले पोषकतत्वे शरीराला उपयुक्त आहे. तसेच बर्याच प्रकारच्या धार्मिक प्रसंगी नारळाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
benifit of coconut cultivation

benifit of coconut cultivation

नारळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नारळ हे एक आरोग्यदायी साठी खूपच फायदेशीर असून त्यामध्ये असलेले पोषकतत्वे शरीराला उपयुक्त आहे. तसेच बर्‍याच प्रकारच्या धार्मिक प्रसंगी नारळाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो.

त्यामुळे नारळाना वर्षभर मागणी मोठ्या प्रमाणात असते. जर आपण नारळाचा विचार केलातर नारळाचा असा कोणताही भाग नाही की ज्याचा कुठल्या वापर होत नसेल.नारळाच्या प्रत्येकच भागाचा आता कुठल्या ना कुठल्या उद्देशाने वापर करण्यात येतो.

त्यामुळे नारळ शेती ही शेतकऱ्यांसाठी नफ्याची शेती ठरते. आपण साध कुणाला बघायला हॉस्पिटलला जातो तरी नारळ नेतो  कारण नारळाच्या पाण्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन, विटामिन सी, सल्फर आणि ब जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. 

नारळ पाणी पिल्याने तहान भागते तसेच अंगामध्ये असलेला ताप दूर करण्यासाठी असलेले गुण त्यामध्ये आहेत.एवढेच नाही तर त्वचेचे रोग घालवण्यासाठी,केसांची योग्य पद्धतीने वाढ करण्यासाठी व शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी देखील नारळ तेलाचा वापर होतो.

जर आपल्या भारतामधील नारळ शेतीचा किंवा लागवडीचा विचार केला तर दक्षिण भारतातील किनारी भागात म्हणजेच केरळ,कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू त्या भागात मोठ्या प्रमाणात केली जाते व ही राज्य सर्वात मोठे नारळ उत्पादक राज्य आहेत.

नक्की वाचा:आईस क्यूब व्यवसाय: उन्हाळ्यात बंपर कमाई देईल हा व्यवसाय, धाडस करुन करा सुरु

 नारळाच्या पाण्याला देशभर मागणी

 नारळ पाण्याला देशभर मागणी असून दक्षिण भारताव्यतिरिक्त देशभरात नारळ पाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

जर आपण दक्षिण भारताचा विचार केला तर नारळाच्या पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करून बाटल्यांमध्ये नारळ पाणी विकले जाते.प्रक्रियेसाठी चांगल्या प्रतीचे हिरवे नारळ निवडले जाते.प्रक्रिया युनिट मध्ये नेऊन पाणी बाहेर काढले जाते आणि नंतर ते फिल्टर करून बाटल्यांमध्ये भरले जाते.

त्यानंतर पॅकिंग करून ते बाजारात विकले जाते.बाटलीबंद नारळाच्या पाण्याचे मार्केटिंग करणे तसे कठीण काम आहे, कारण नारळाचे पाणी जवळपास सर्वत्र सहज उपलब्ध आहे पण हळूहळू त्याचे बाजारपेठ तयार होत आहे. आखाती तसेच युरोपीय देशांत शिवाय आता अमेरिकेतही यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

नारळाचे नुसते पाणीच नाही तर नारळाचा प्रत्येक भाग महत्त्वाचा असून त्यापासून नारळ पावडर, नारळाचे दूध, नारळाच्या दूधाची पावडर, कॉयर फायबर आणि कोकोपिट सारखी उत्पादने तयार केली जातात. त्याच वेळी कोळशाच्या कठोर कवचापासून आणि विनेगर परिपक्व नारळाच्या पाण्यापासून बनवले जाते. तसेच त्यापासून उत्तमप्रतीचे दोरखंड देखील बनवले जाते.

नारळ शेतीतील सर्वात महत्त्वाची आणि जमेची गोष्ट म्हणजे शेतकरी यामध्ये वर्षभर चांगले उत्पन्न मिळवू शकतात. जर तुमच्याकडे अवघे शेतात डझनभर तरी नारळाची झाडे असतील तर नारळ सतत वाढत राहते आणि ते विकून तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळते. पारंपरिक पिकांच्या लागवडी सोबत शेतकरी शाश्वत उत्पन्नाच्या स्रोतसाठी नारळाची लागवड करू शकतात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो रासायनिकपेक्षा जीवामृतच फायदेशीर, आता घरच्या घरीच करा तयार

नक्की वाचा:शेळीपालनाची करा सुरुवात अन 'या' बँकांकडून घ्या 50 लाखांपर्यंत कर्ज, वाचा आणि जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

English Summary: coconut processing bussiness is important for develop of rural area and self Published on: 15 June 2022, 11:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters