MFOI 2024 Road Show
  1. कृषी व्यवसाय

Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत

शेतकरी चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. युरियामुळे पिकांना नायट्रोजनचा पुरवठा होतो, जो वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु युरिया हे जैविक खत नसल्याने नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा उद्देश पूर्ण होत नाही.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Green Manure

Green Manure

शेतकरी चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. युरियामुळे पिकांना नायट्रोजनचा पुरवठा होतो, जो वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु युरिया हे जैविक खत नसल्याने नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा उद्देश पूर्ण होत नाही.

मात्र आपण एका खताविषयी माहिती घेणार आहोत, या खताच्या वापराने युरियाची गरज भासणार नाही आणि तण सारख्या समस्या देखील मुळापासून नष्ट केल्या जाऊ शकतात.

हिरवळीचे खत

हिरवळ ही एक तणाची वनस्पती आहे. ज्याचा उपयोग शेतासाठी हिरवळीचे खत बनवण्यासाठी केला जातो. धेंचाची म्हणजेच हिरवळीची रोपे उगवल्यावर त्यांची कापणी करून हिरवे खत बनवता येते. त्यानंतर ती पुन्हा उगवते. हिरवळीच्या शेतीने शेतात नैसर्गिक नायट्रोजनचा पुरवठा होतो.

धेंचाची लागवड अशी करा

हिरवळीची लागवड नेहमीच्या पद्धतीने केली जाते. पेरणीनंतर दीड महिन्यात धेंचा रोपांची लांबी 3 फूट होते आणि त्याच्या गाठींमध्ये नायट्रोजनचा साठा भरला जातो. तुम्ही बागायती पिकांसोबत हिरवळीची लागवड देखील करू शकता. हे पिकांच्या मध्यभागी लावले जाते, त्यामुळे तणांचा त्रास होत नाही.

हिरवळीची लागवड केल्याने आपल्याला शेतात झाडीसारखे उत्पादन मिळते, त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत नाही. हा धेंचा आहे जो पिकातील नायट्रोजन तसेच फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता पूर्ण करतो.

जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा; करा वेळीच उपचार, अन्यथा होईल मोठे नुकसान

फुले येत असताना खत तयार करा

नगदी पिकांना कमी खर्चात उत्तम पोषण मिळावे म्हणून हिरवळीची लागवड रब्बी किंवा खरीप हंगामापूर्वी केली जाते. पीक फुलल्यानंतर काढणी केली जाते. यावेळी, धेंचाची मुळे भरपूर नायट्रोजन शोषून घेतात. काढणीनंतर संपूर्ण शेतात हिरवळीचे खत टाकून हलके सिंचनही केले जाते.

दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा

युरियाचा खर्च वाचेल

1) हिरवळ लागवडीनंतर हिरवळीचे खत वापरल्यास युरियाची गरज एक तृतीयांश कमी होते, ज्यामुळे पैसा आणि संसाधनांची बचत होते. धेंचाचे हिरवे खत बनवून वापरल्यास शेतात तण येण्याची शक्यता नसते, त्यामुळे तण काढणे व तणनियंत्रणाचा मोठा खर्च कमी होतो.

2) हिरवळीच्‍या पानात नत्राचा रस मुबलक प्रमाणात असतो. त्‍यामुळे कीटक व पतंगांचा प्रादुर्भाव थेट पिकावर होत नाही व पिके सुरक्षित राहतात आणि पिकांना नायट्रोजन तसेच स्फुरद आणि पोटॅशचा पुरवठा होतो. त्यामुळे पोषक तत्वांवर होणारा वेगळा खर्च वाचतो.

3) याबरोबरच पिकांसोबत जमिनीचे आरोग्यही राखले जाते. धेंचामुळे भूजल पातळी राखली जाते, ज्याला जास्त सिंचनाची आवश्यकता नसते.

महत्वाच्या बातम्या 
Soybean Market Price: सोयाबीन बाजारभावात मोठा बदल; जाणून घ्या सोयाबीचे दर
Horoscope 23 August: मंगळवार या राशींसाठी आहे शुभ; मिळेल आनंदवार्ता
Weed Control: असे करा मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, पिकांमधील तणाचे नियंत्रण

English Summary: Green Manure Crops urea fertilizer field home Published on: 23 August 2022, 11:01 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters