1. इतर बातम्या

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा पंतप्रधान पीक विम्यासाठी; जाणून घ्या पद्धत

शेतकरी मोठ्या मेहनतीने आपली शेती पिकवत असतो. परंतु निसर्गाच्या अनिश्चितीमुळे आणि लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. असते. पाऊस कमी झाला का पिकांचे उत्पादन कमी होत असते. तर कधी अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्यात वाहून जात असतात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेतकरी मोठ्या मेहनतीने आपली शेती पिकवत असतो. परंतु निसर्गाच्या अनिश्चितीमुळे आणि लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. असते. पाऊस कमी झाला का पिकांचे उत्पादन कमी होत असते. तर कधी अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये एक योजना आणली होती, या योजनेचे नाव आहे पीक विमा योजना. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. जेणेकरून त्यांचे उत्पन्नात एक स्थिरता येईल.  आज आपण या योजनेविषयी आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घेऊ.

कसा कराल पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज ( PMFBY )

या योजनेच्या लाभासाठी तुम्ही बँकेतून अर्ज करु शकता परंतु बँकेत न जाता तुम्ही आता ऑनलाईनही या योजनेचा लाभ घेऊ शकता.  यासाठी तुम्हाला https://pmfby.gov.in/.In  या संकेतस्थळावर जावे लागेल.

कोणते कागदपत्र लागतात पीएम पीक विमा  योजनेसाठी

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आपल्याला काही कागदपत्रे द्यावी लागतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, चालक परवाना, मतदान कार्ड, आपला रहिवाशी पुरावा, यासह आपल्या पिकांची माहितीसाठी सरपंचाचे पत्र हवे.  आपल्या जमिनीची माहिती सात बारा उतारा, जर आपण दुसऱ्याची जमीन कसत आहोत तर आपले करार पत्र दाखावे लागते. या सगळ्या कागदपत्रांसह एक बाद केलेला धनादेश द्यावा लागतो.

 

पीक विम्याचा दावा क्लेम करताना या गोष्टींची काळजी घ्या

जर नैसर्गिक आपत्ती आली तर हंगामानंतर १४ दिवासांनी आपण क्लेम करु शकतो.  या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त इतर कोणत्याही परिस्थितीत विमा उपलब्ध होणार नाही.  या योजनेत दावा करताना शेतकऱ्यांना दीड टक्के प्रीमियम आणि खरीप पिकासाठी दोन टक्के प्रीमियम भरावा लागतो. पंतप्रधान  पीक विमा योजनेत कोणत्या गोष्टींसाठी संरक्षण देण्यात आले आहे ?

खरीप हंगामाकरीता

१) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे  पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.

२) पिकांच्या हंगामातील हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.

३)  पिकाच्या लावणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ पूर, क्षेत्र  क्षेत्र जलमय होणे, भूस्सखलन, दुष्काळ, पावसातील खंडकीडरोग यामुळे येणारी उत्पन्नात घट.

४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान.

५) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे काढणीपश्चात नुकसान.

रब्बी हंगामाकरिता

१) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.

२) पिकांच्या हंगामातील  हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे  नुकसान.

३)   पिकाच्या लावणीपासून काढणी पर्यंतच्या  कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ पूर,क्षेत्र  क्षेत्र जलमय होणे, भूस्सखलनदुष्काळ, पावसातील खंडकीड रोग यामुळे येणारी उत्पन्नात  घट.

४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान.

५) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे काढणीपश्चात नुकसान.

दरम्यान आपण आपल्या पीक विम्याविषयी मोबाईल अॅप द्वारेही माहिती घेऊ शकता.   यासाठी तुम्हाला बजाज अलियान्सचे फार्मामित्र हे मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल.  यात तुम्हाला हवामानाचा नियमित अंदाज, निवडलेल्या पिकांनुसार सल्ला, पिकांचे बाजारभाव, शेती घडामोडींशी संबंधित बातम्या तसेच बियाणे / माती परीक्षण प्रयोगशाळेसाठी लॅबची माहिती, खत विक्रेते, त्याभोवती कोल्ड स्टोरेजची माहिती मिळेल.

English Summary: Apply online for PM crop insurance, know the method Published on: 13 August 2020, 06:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters