ही योजना काजू पिकासाठी अधिसुचित जिल्ह्यामधील, अधिसुचित तालुक्यातील, अधिसुचित महसूल मंडळात लागू आहे. यानुसार निवडलेल्या विमा कंपनी मार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनमान्य संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरुन नुकसान भरपाई अंतिम केली जाते.
समविष्ट जिल्हे (०७): कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक इत्यादी.
या योजनेतंर्गत काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
|
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी |
प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.) |
||||||||||||||
|
अवेळी पाऊस |
कोणत्याही एका दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 11,000/- देय |
||||||||||||||
|
कमी तापमान |
तापमान सलग 3 दिवस 13 डि.ग्री. सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 11,450/- देय |
||||||||||||||
|
|||||||||||||||
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा:
सदर फळपिक विमा योजना खालील यंत्रणेमार्फत खालील जिल्हयातील काजू फळ पिकासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.
| अ.क्र. | विमा कंपनीचे नाव | जिल्हे | एकूण जिल्हे |
| 1 | दि न्यू इंडिया इन्शुरेंस कंपनी फोन क्र. ०२२-२२७०८१०० टोल फ्री.क्र. १८०० २०९१ ४१५ ईमेल: [email protected] |
रत्नागिरी | 1 |
| 2 | अॅग्रिकल्चर इन्शुरेंस कंपनी ऑफ इंडिया लि. फोन क्र. ०२२-६१७१०९१२ टोल फ्री.क्र. १८०० १०३० ०६१ ईमेल: [email protected] |
कोल्हापूर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक | 06 |
या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकर्यांनी संबंधित विमा कंपनी, संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी आणि योजनेत सहभाग घ्यावा.
श्री. विनयकुमार आवटे,
अधिक्षक कृषि अधिकारी (मनरेगा), पुणे विभाग
9404963870
Share your comments