![](https://kjmarathi.b-cdn.net/media/12204/money800.jpg)
तुम्हाला जर सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरू शकते. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्यामधून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
पोस्ट ऑफिसची ग्राम सुमंगल योजना ही सर्वात फायदेशीर गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्हाला प्रतिदिन फक्त 170 रुपये गुंतवावे लागतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 19 लाख रुपयांचा निधी मिळू शकेल.
ही पोस्ट ऑफिस योजना (post office scheme) ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी सर्वोत्तम आहे. ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेत तुम्ही दररोज 170 रुपये वाचवू शकता आणि संपूर्ण सुरक्षिततेसह 19 लाख रुपयांपर्यंत चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेत मनी परतीचा लाभ देखील पूर्ण संरक्षणासह उपलब्ध आहे.
मिरची उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; प्रतिक्विंटलला मिळतोय तब्बल १८ हजार ५०० रुपये दर
या योजनेचा लाभ तुम्हाला 15 वर्षे ते 20 वर्षांसाठी घेता येईल. ग्राम सुमंगल योजनेची पॉलिसी (policy) घेण्यासाठी वयोमर्यादा 19 वर्षे ते 45 वर्षे आहे. विशेष म्हणजे कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो.
मासिक पाळी उशिरा का येते? जाणून घ्या नेमकं कारण...
समजा तुम्ही 25 वर्षांचे आहात. तुम्ही तुमच्यासाठी 10 लाखांची विमा रक्कम (vima prize) खरेदीसाठी जर त्याने पॉलिसीची मुदत 15 वर्षांसाठी ठेवली, तर निव्वळ मासिक प्रीमियम 6793 रुपये असेल. जर पॉलिसीची मुदत 20 वर्षांसाठी ठेवली असेल तर मासिक प्रीमियम 5121 रुपये असेल, म्हणजे 170 रुपये प्रतिदिन इतके भरावे लागतील.
महत्वाच्या बातम्या
रब्बी हंगामासाठी 9 लाख टन खतांची मागणी; शेतकऱ्यांना होणार फायदा
महत्वाची बातमी! LIC आयडीबीआय बँकेतील आपला 60.72 टक्के हिस्सा विकणार
धक्कादायक! गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Share your comments