1. बातम्या

पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली; पुढचा पंधरवडा महत्वाचा

“आजपर्यंत, माळवा प्रदेशात पाऊस कमी असला तरी सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी मान्सून चांगला आहे . पण आमच्याकडे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ आहे".

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली

पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली

देशात सोयाबीन, धान, कापूस या खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला असून, पुढील पंधरवड्यात पडणारा पाऊस महत्त्वाचा असेल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. मध्यप्रदेशातील माळवा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप सोयाबीन पेरणीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही, तर गुजरातमधील शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने कापूस पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे.

हरियाणामध्ये, अधूनमधून मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना भात पिकाची पेरणी करण्यास मदत केली आहे. शिवाय बंगालमधील भात उत्पादक शेतकरीही पेरणी करत आहेत. “आजपर्यंत, माळवा प्रदेशात पाऊस कमी असला तरी सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी मान्सून चांगला आहे . पण आमच्याकडे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ आहे.

या पंधरवड्यात पाऊस झाल्यास या भागातही पेरणीला वेग येईल असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) चे कार्यकारी संचालक डीएन पाठक यांनी सांगितले. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, गेल्या खरीपात भारताने 127.20 लाख टन सोयाबीनचे उत्पादन केले होते .गुजरातमध्ये खरीप हंगामासाठी कापसाची पेरणी मागील हंगामाच्या तुलनेत किमान 15% वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पीक त्याच्या वेळापत्रकाच्या आधीच पेरण्याची घाई होत असल्याचे उद्योग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गेल्या हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगला भाव मिळाला होता. तसेच तसेच हरियाणातील बासमती तांदूळ उत्पादक विजय सेटिया म्हणाले की, राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अधूनमधून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना बासमती पिकाची पेरणी करण्यास मदत झाली आहे. खरीप 2021 मध्ये, भारतात 107.04 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन झाले होते.

शेतातील मातीच्या मशागतीसाठी'डिस्क हॅरो' यंत्र आहे शेती क्षेत्रातील हिरो, जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशातील बहुतेक भागांमध्ये हळूहळू कमाल तापमानात 2-4 अंश सेंटीग्रेडने वाढ होण्याची शक्यता आहे. 27 ते 29 जून दरम्यान, प्रायद्वीपीय भारत आणि पूर्व भारतात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर वायव्य आणि मध्य भारतात पावसात वाढ होऊ शकते, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:
FICCI ने कृषी रसायनांवरील GST 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे केले आवाहन
'जमुनापरी शेळी' देईल शेळीपालनात बंपर नफा, घ्या 'या' गोष्टींची काळजी

English Summary: The number of farmers for sowing increased almost; The next fortnight is important Published on: 23 June 2022, 05:41 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters