1. बातम्या

शेतकऱ्यांसाठीचे भारनियमन थांबवा; नाहीतर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा

सध्या राज्यात उष्णतेची लाट वाढत आहे. जसजसे तापमान वाढत आहे तसतशी राज्यातील विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात सध्या तीव्र वीजटंचाई आहे. राज्यात लोडशेडिंगच्या संकटामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांसाठीचे भारनियमन थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा

शेतकऱ्यांसाठीचे भारनियमन थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा

सध्या राज्यात उष्णतेची लाट वाढत आहे. जसजसे तापमान वाढत आहे तसतशी राज्यातील विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात सध्या तीव्र वीजटंचाई आहे. राज्यात लोडशेडिंगच्या (Load shedding) संकटामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोळशाचा (Coal) तुटवडा आणि विजेची वाढलेली मागणी ही कारणे महावितरण (MSEDCL) आणि ऊर्जा विभागाने दिली आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

भारनियमचा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असताना भारनियमन सुरू केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके याचे नुकसान होत आहे. या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty head of Swabhimani Shetkari Sanghatana) यांनी महावितरणसह ऊर्जा विभागावर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकर्‍यांवरच भारनियमन लादले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

चिंताजनक : महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता

राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना आता आठ तासांवरून तीन ते साडेतीन तास वीज मिळत आहे. त्यामुळे उभी पिके डोळ्यासमोर दिसू लागली आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकर्‍यांवरच भारनियमन लादले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Prickly Pear : निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा

English Summary: Stop weight regulation for farmers; Otherwise, he will take to the streets, Raju Shetty warned Published on: 14 April 2022, 10:13 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters