1. बातम्या

आता ४ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली, कृषिमंत्री तोमर

नाविन्यपूर्ण शेतीवरील राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना तोमर म्हणाले की, निसर्गाशी सुसंगत शेती करणे ही काळाची गरज आहे.

Now 4 lakh hectares of land is under natural agriculture.

Now 4 lakh hectares of land is under natural agriculture.

नाविन्यपूर्ण शेतीवरील राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना तोमर म्हणाले की, निसर्गाशी सुसंगत शेती करणे ही काळाची गरज आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सोमवारी सांगितले की, परंपरागत कृषी विकास योजनेच्या उप-योजनेचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे ४ लाख हेक्टर नैसर्गिक शेतीखाली आणले गेले आहे . आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरातचे काही भाग हळूहळू नैसर्गिक शेतीशी जुळवून घेत आहेत , निसर्गाशी एकरूप होणारी, उत्पादन खर्च कमी करणारी, चांगल्या दर्जाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी शेती करणे ही काळाची गरज आहे.

आजच्या कार्यशाळेत शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर निती आयोग नैसर्गिक शेतीवर एक रोडमॅप तयार करेल आणि त्यानुसार मंत्रालय पुढे जाईल.काहींना "नैसर्गिक शेतीकडे वळल्याने उत्पादनात घट होण्याची भीती वाटत असेल परंतु नैसर्गिक शेतीच्या यशोगाथा पाहिल्यानंतर समजेल." कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सुमारे ३८ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणले गेले आहे. परंपरागत कृषी विकास योजनेच्या उप-योजनेचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आहे. निकोबार आणि लडाखच्या भागात जिथे रसायने वापरली जात नाहीत अशा शेतजमिनी प्रमाणित करण्यासाठी केंद्रीय कार्यक्रम सुरू आहे.

प्रमाणपत्रासाठी अशी शेतजमीन ओळखण्यासाठी केंद्र राज्यांकडे पाठपुरावा करत आहे, असे ते म्हणाले. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करत आहे आणि कृषी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनही याचा समावेश करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करत आहे आणि कृषी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणूनही याचा समावेश करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.  तोमर म्हणाले, "रासायनिक शेतीमुळे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे, परंतु काही मर्यादा आहेत. शेतकरी उत्पन्न मिळवू शकतात परंतु खते आणि पाण्याच्या जास्त वापरामुळे ते तणावाखाली आहेत.  देशातील सुमारे ६ टक्के क्षेत्र कोणतेही रसायन वापरत नाही आणि हे क्षेत्र नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी लक्ष्य केले जाऊ शकते. असे काही जिल्हे आहेत जिथे रसायनांचा वापर ५ किलोपेक्षा कमी आहे, त्यांना देखील प्रोत्साहन दिले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! पीएम किसान योजनेचे 2 हजार 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही
जाणून घेणे महत्त्वाचे! 'या'पद्धती ठरतात सेंद्रिय शेती साठी उपयोगी

English Summary: Now 4 lakh hectares of land is under natural agriculture, says Agriculture Minister Tomar Published on: 26 April 2022, 05:19 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters