1. बातम्या

Budget 2024: २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल-निर्मला सीतारामन

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला.सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे.देशाची अर्थव्यवस्था खूप चांगली आहे. लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत.ग्रामीण विकासाच्या योजना वेगाने लागू होत आहेत.१० वर्षांत महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर होता.अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतांना म्हणाल्या आहेत

प्रतिक्षा दिपक काकडे
प्रतिक्षा दिपक काकडे
Budget 2024: २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल-निर्मला सीतारामन

Budget 2024: २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल-निर्मला सीतारामन

मोदी सरकारकडून आज (दि.१) रोजी देशाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने झाला आहे.गेल्या १० वर्षात सकारात्मक विकास झाला.२०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल,असे यावेळी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला आहे.

 

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला,सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे, असं अर्थमंत्री भाषणादरम्यान म्हटल्या आहेत.मोदी सरकारने ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे.मूलभूत गरजा पूर्ण झाल्याने त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे.गरिबांचं कल्याण,गरजा आणि आशा- आकांक्षा यांना आमचं प्राधान्य आहे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत.अस त्या बोलतांना म्हणाल्या आहेत.

 

२०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल-निर्मला सितारामन

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला.सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे.देशाची अर्थव्यवस्था खूप चांगली आहे. लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत.ग्रामीण विकासाच्या योजना वेगाने लागू होत आहेत.१० वर्षांत महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर होता.अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतांना म्हणाल्या आहेत की मोदी सरकारने प्रत्येक घरात पाणी,वीज, गॅस, आर्थिक सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. सर्वसामन्यांची अन्नधान्याची चिंता दूर करण्यात आली आहे.मोदी सरकारने ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे.मूलभूत गरजा पूर्ण झाल्याने त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे.असेही यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या आहे. २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल, आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत, असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

अशा अनेक योजनांच्या माध्यमातुन सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत,सरकार जनतेसाठी कटबद्ध असल्यामुळे २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल असेही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्यात.

 

 

English Summary: India will become a developed nation by 2047-Nirmala Sitharaman nirmala sitaraman Published on: 01 February 2024, 12:26 IST

Like this article?

Hey! I am प्रतिक्षा दिपक काकडे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters