1. बातम्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पत वर्तणुकीत सुधारणा, कृषी एनपीए झाला कमी

वित्तीय संस्था तसेच कृषी तज्ज्ञांनी सांगितले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पत वर्तणुकीत सुधारणा झाली आहे, त्यामुळे कृषी एनपीए झाला आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजना तसेच चांगला परतावा आणि शेतकऱ्यांमधील सुधारित पत वर्तन यांचे एकत्रित प्रतिबिंब असल्याचे ते म्हणतात.

Improving credit behavior of farmers in Maharashtra

Improving credit behavior of farmers in Maharashtra

वित्तीय संस्था तसेच कृषी तज्ज्ञांनी सांगितले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पत वर्तणुकीत सुधारणा झाली आहे, त्यामुळे कृषी एनपीए झाला आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजना तसेच चांगला परतावा आणि शेतकऱ्यांमधील सुधारित पत वर्तन यांचे एकत्रित प्रतिबिंब असल्याचे ते म्हणतात.

कोरोना साथीच्या सुरुवातीपासून कृषी हे एकमेव क्षेत्र आहे ज्यामध्ये सातत्यपूर्ण सकारात्मक वाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर, महाराष्ट्रातील कृषी वित्तक्षेत्रात प्रत्यक्षात सुधारणा दिसून आली असून बँकांनी नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) कमी नोंदवल्या आहेत. बँकर्स आणि कृषी वित्त तज्ज्ञांनी सांगितले की हे राज्य सरकारच्या कर्जमाफी योजना तसेच चांगला परतावा आणि शेतकऱ्यांमधील सुधारित पत वर्तन यांचे एकत्रित प्रतिबिंब आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत करण्यासाठी बँकांद्वारे या कृषी क्षेत्राला अल्पकालीन आणि दीर्घकालीन वित्तपुरवठा केला जातो. अल्पकालीन वित्त म्हणजे ११ महिन्यांसाठी ७% व्याजदराने शेतकर्‍यांना कर्ज दिले जाते, याला पीक कर्ज म्हणतात. शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून ५-६% पर्यंत व्याज सवलत मिळते ज्यामुळे वेळेवर परतफेड केल्यास १% व्याज दर प्रभावी होतो. ठिबक सिंचन, ट्रॅक्टर इत्यादी कृषी पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना ४ ते ९% व्याजदराने कर्ज दिले जाते. व हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ दिला जातो.

कृषी क्षेत्राला प्राधान्य असल्याने, कृषी क्षेत्राला कर्ज देण्यावर राज्यस्तरीय वित्त संस्था, राज्यातील बँकांची सर्वोच्च संस्था यांच्याद्वारे बारकाईने निरीक्षण केले जाते. द इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या मीटिंगच्या आधारे असे दिसून आले आहे की, गेल्या दोन वर्षांत, बँकर्सनी या क्षेत्रातील NPA मध्ये घट नोंदवली आहे.

अशा प्रकारे, ३१ डिसेंबर २०१९ रोजी या क्षेत्रातील NPA १९.२९% होता आणि थकबाकी १.३९  लाख कोटी रुपये होती. एका वर्षानंतर, म्हणजे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत NPA १८% कमी झाला आणि थकबाकी १.३ लाख कोटी रुपये झाली. ३१ डिसेंबर २०२१ रोजी कृषी NPA मध्ये आणखी घट होऊन १७.७९% झाली आणि थकबाकी १.७९ लाख कोटी रुपये झाली. वित्तीय संस्थांनी सांगितले की, कर्जाची वेळेवर परतफेड आणि जुन्या कर्जाची परतफेड देखील सकारात्मक आहे.

महत्वाच्या बातम्या;
आपत्कालीन संकटांपासून कसे कराल पिकांचे संरक्षण? शेडनेटमधील शेती म्हणजे काय ?
Corona Mask; देशात कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क केला बंधनकारक..

 

English Summary: Improving credit behavior of farmers in Maharashtra, reduced agricultural NPAs Published on: 23 April 2022, 11:37 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters