1. बातम्या

आनंदाची बातमी! अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपदामुळे पिकाचे नुकसान झाले तर सरकार नुकसान भरपाई देणार; वाचा सविस्तर

पाऊस किंवा वादळामुळे तुमचे पीक नष्ट झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अशा कोणत्याही परिस्थितीसाठी सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना चालवली आहे. परंतु अजूनही 70 टक्के शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाऊस किंवा वादळामुळे नष्ट झालेल्या पिकांची भरपाई मिळते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pm modi

pm modi

पाऊस किंवा वादळामुळे तुमचे पीक नष्ट झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अशा कोणत्याही परिस्थितीसाठी सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना चालवली आहे. परंतु अजूनही 70 टक्के शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाऊस किंवा वादळामुळे नष्ट झालेल्या पिकांची भरपाई मिळते.

अनेक वेळा शेतकरी कर्ज काढून पिकात पैसे गुंतवतो, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट होते. त्यामुळे शेतकरी कुटुंब अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली आहे.

आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पाऊस किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत उध्‍वस्त झालेल्या पिकांची भरपाई दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रीमियम भरावा लागतो.

यामध्ये त्यांना खरीप पिकांसाठी विम्याच्या रखमेचा 2%, रब्बी पिकांसाठी विम्याच्या रखमेचा 1.5% प्रीमियम भरावा लागेल. तर व्यावसायिक बागायती पिकांसाठी विम्याच्या रखमेचा 5% प्रीमियम भरावा लागतो. 

या योजनेतील दाव्याचे प्रमाण 88.3 टक्के आहे. परंतु माहितीनुसार आजही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. म्हणूनच या योजनेच्या माहितीसाठी सरकारने अनेक कार्यक्रमही राबवले आहेत.

अशी आहे अर्ज पद्धत

प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर (Apply as a Farmer) चा पर्याय निवडा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्ज काळजीपूर्वक भरा. तसेच हार्ड कॉपी काढा आणि सोबत ठेवा. यानंतर कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाल्यास 88 टक्के पीक नुकसान भरपाई मिळवा.

English Summary: If the crop is damaged due to heavy rains or natural calamities, the government will provide compensation Published on: 17 July 2022, 07:53 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters