MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

टोमॅटोसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर, सांगितले धक्कादायक कारण

सध्या बाजारात टोमॅटोच्या भावाने 150 रुपये किलोचा आकडा ओलांडला आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोसाठी ग्राहकांची दुकानदारांशी भांडणे सुरू असल्याची परिस्थिती आहे. वाढत्या किमतीमुळे लोक कमी प्रमाणात टोमॅटो खरेदी करत आहेत, मात्र त्यासाठीही त्यांना चांगली रक्कम मोजावी लागत आहे. अशा स्थितीत दुकानदारांकडून दराबाबत कडक कारवाई होत असताना ग्राहक त्यांच्याशी भांडू लागले आहेत.

Bouncer deployed by shopkeeper for tomatoes (image google)

Bouncer deployed by shopkeeper for tomatoes (image google)

सध्या बाजारात टोमॅटोच्या भावाने 150 रुपये किलोचा आकडा ओलांडला आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोसाठी ग्राहकांची दुकानदारांशी भांडणे सुरू असल्याची परिस्थिती आहे. वाढत्या किमतीमुळे लोक कमी प्रमाणात टोमॅटो खरेदी करत आहेत, मात्र त्यासाठीही त्यांना चांगली रक्कम मोजावी लागत आहे. अशा स्थितीत दुकानदारांकडून दराबाबत कडक कारवाई होत असताना ग्राहक त्यांच्याशी भांडू लागले आहेत.

यावर भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, टोमॅटो महागले असताना ते स्वस्त दरात विकणार कुठून. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सुरक्षेसाठी सोन्या-चांदीच्या दुकानांवर पहारेकरी ठेवले जातात. त्याचप्रमाणे आता भाजीच्या दुकानांवरही टोमॅटोसाठी व्हीआयपी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजी दुकानदाराने टोमॅटोसाठी बाऊन्सर तैनात केले आहे. होय, हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल, पण ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बनारसचे आहे. लूट टाळण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी आपल्या दुकानांवर बाऊन्सर तैनात केले आहेत. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने सुरू केली बक्षीस योजना, जाणून घ्या...

अजय फौजी असे भाजी विक्रेत्याचे नाव आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लोक भांडतात आणि लुटतात. हे टाळण्यासाठी त्यांनी बाउन्सर तैनात केले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भाजी विक्रेत्याने त्याच्या दुकानावर एकूण दोन बाऊन्सर तैनात केल्याचे दिसत आहे.

तो कोणालाही टोमॅटोला हात लावू देत नाही. देशातील बहुतांश भागात टोमॅटो 160 रुपये किलोने विकला जात आहे. अशा स्थितीत पूर्वी जे टोमॅटो किलोच्या आधारे खरेदी करायचे. आता ते 100 किंवा 200 ग्रॅमपर्यंत मर्यादित आहेत.टोमॅटोचे भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादनात झालेली घट.

कृषी जागरणचे राष्ट्रीय व्यासपीठ देशातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान..

अवकाळी पाऊस आणि कडक उन्हामुळे देशातील अनेक ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे त्याची किंमत आजकाल लोकांच्या खिशावर डल्ला मारत आहे. मात्र, लवकरच टोमॅटोचे भाव पूर्वीप्रमाणेच राहतील, असे आश्वासन भारत सरकारकडून देण्यात आले आहे.

टोमॅटो ६० रुपये किलोने मिळणार! सरकारने सुरु केली योजना, जाणून घ्या..
शेतकरीच नवरा पाहिजे! उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या तरूणीचा हट्ट, वडिलांनी अखेर तिची इच्छा केली पूर्ण..

English Summary: Bouncer deployed by shopkeeper for tomatoes, said shocking reason Published on: 10 July 2023, 04:43 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters