1. बातम्या

देशात नवी 'हरित क्रांती' घडवण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करा- अमित शहा

सध्या देशात रासायनिक खतांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यामुळे जमिनीचा दर्जा खालावत चालला आहे. तसेच यामुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. असे असताना केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन केले आहे. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारून भारतात "नवीन हरित क्रांती" घडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Amit Shah

Amit Shah

सध्या देशात रासायनिक खतांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यामुळे जमिनीचा दर्जा खालावत चालला आहे. तसेच यामुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. असे असताना केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन केले आहे. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारून भारतात "नवीन हरित क्रांती" घडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. यावेळी त्यांनी या शेतीबद्दल माहिती देखील दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी अशा प्रकारे शेती करत देखील आहेत.

यावेळी अमित शहा म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खते ही एक मोठी चिंतेची बाब म्हणून ओळखली आणि त्यांचा वापर कमी करण्यासाठी मार्ग शोधण्यास सुरुवात केली, तसेच कृषी उत्पादकता वाढवण्याचा, पाण्याचा वापर कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपत्ती प्रदान करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. रासायनिक खतांच्या गैरवापरामुळे शेतजमीन नापीक होत आहे आणि मातीची गुणवत्ता कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकरी समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

शेतकरी उत्पादक संस्था च्या नेटवर्कद्वारे नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पिकवलेल्या मालाची बाजारपेठ करण्यासाठी गुजरात सरकारच्या नैसर्गिक शेतीचा लोगो आणि ई-व्हॅनच्या प्रकल्पाचे अनावरण केल्यानंतर शहा शेतकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी देखील उपस्थित होते. आपण नैसर्गिक शेतीद्वारे नवीन हरितक्रांतीची सुरुवात करू या, जी जमीन नष्ट करण्याऐवजी पुढील अनेक वर्षे टिकवून ठेवते आणि तिचे संवर्धन करते. यासाठी नैसर्गिक शेती हा एकमेव मार्ग आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच देशी गायीचे मूल्य संपूर्ण जगाने स्वीकारली पाहिजे, तसेच नैसर्गिक शेती आता भारतासाठी महत्त्वाची आहे, परंतु मला विश्वास आहे की संपूर्ण जगाला आपल्या देशाने अग्रेसर केलेल्या नैसर्गिक कृषी पद्धतींचा अवलंब करावा लागेल, असेही ते म्हणाले. येणाऱ्या काळात यामध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. यामुळे शेतकरी देखील सुखी आणि समृद्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

English Summary: Adopt natural farming techniques to create a new 'green revolution' in the country - Amit Shah (2) Published on: 18 January 2022, 04:44 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters