
446 crores from 10258 lawsuits in 22 districts in the state
राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांचे ऊस तोडणी मुकादमाकडून मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील ऊस वाहतूकदार मोठया प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत.
गेल्या २ वर्षात राज्यामध्ये २२ जिल्हयातील १०२५८ मुकादमांनी ४४६ कोटी रूपयाची वाहतूकदारांची फसवणूक केलेली आहे. सदरची आकडेवारी ही राज्यातील साखर कारखान्याकडून अधिकृत असून थेट वाहतूकदारांनी दिलेली रक्कम पकडल्यास रक्कम जवळपास १ हजार कोटी रूपयाच्या घरात आहे.
दिवसेंदिवस राज्यामध्ये मुकादमाकडून फसवणुकीचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामुळे ऊस वाहतूकदार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
याकरिता राज्यातील साखर कारखान्यांना व ऊस वाहतूकदारांना मजूर पुरवठा करत असताना सदर मजूराची शासनाने निर्माण केलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळाकडे ऊस तोडणी मजूरांची नोंदणी करण्यात यावी. नोंद झाल्याशिवाय कारखाना व वाहतूकदार यांचा करार न करण्याबाबत आदेश साखर कारखांन्याना काढण्यासंदर्भाचे निवेदन महाराष्ट्र राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांनो वाळवी कीटकापासून घ्यावयाची काळजी
यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. यावर अजूनही काही निर्णय झाला नाही. यामुळे मात्र अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही 12 कोटींचा रेडा पाहण्याचा मोह! शेतकऱ्यांचे केले कौतुक..
कारल्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला भाव, शेतकऱ्याला मिळताहेत लाखो रुपये..
राज्यात गहू काढणीला वेग, पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा कष्टमय प्रवास...
Share your comments