1. फलोत्पादन

नवीन द्राक्ष बागेत रिकटची पूर्वतयारी व व्यवस्थापन

द्राक्ष हे भारत देशातील महत्वाचे फळपिक समजले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. महाराष्ट्रातील द्राक्षे त्याच्या विशिष्ट चविमुळे जगभरात लोकप्रिय आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जातात. द्राक्षाचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठी, बेदाणे तयार करण्यासाठी व मद्य तयार करण्यासाठी करतात. इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या द्राक्ष पिक फायदेशीर समजले जाते. त्यामुळे द्राक्ष पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

KJ Staff
KJ Staff


द्राक्ष हे भारत देशातील महत्वाचे फळपिक समजले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. महाराष्ट्रातील द्राक्षे त्याच्या विशिष्ट चविमुळे जगभरात लोकप्रिय आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जातात. द्राक्षाचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठी, बेदाणे तयार करण्यासाठी व मद्य तयार करण्यासाठी करतात. इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या द्राक्ष पिक फायदेशीर समजले जाते. त्यामुळे द्राक्ष पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

द्राक्ष पिकाची अभिवृद्धी कलम करून केली जाते. साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जागेवर (इनसीतु) कलम केले जातात. कलम करतेवेळी खुंट व कलम काडीची जाडी, त्यातील अन्नसाठा, बागेतील परिस्थिती, किड-रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबींमुळे कलमांची वाढ कमी-अधिक होते. तसेच द्राक्ष पिकाच्या पानांचे आयुष्य साधारणत जातीपरत्वे १६० ते १६५ दिवसाचे असते. त्यानंतर ही पाने पिवळी होवून गळून पडतात. म्हणजेच द्राक्षबागेत जर वेलीचा पूर्ण सांगाडा तयार करावयाचा झाल्यास रिकट घेऊनच हे शक्य होते. त्यासाठी नवीन द्राक्षबागेत रिकट हि महत्वाची कार्यवाही पुर्ण करावी लागते.

रिकट हा शक्यतोवर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात घेतला जातो. यावेळी वातावरणातील किमान तापमान हे १५ अंश सें.च्या पुढे असते. अशावेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीस वेग येतो. रिकट घेण्यापूर्वी पूर्वतयारीच्या दृष्टीने द्राक्षबागेतील पुढील काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करणे गजेचे आहे.

रोग नियंत्रण  

या वर्षी बागेत कलम केल्यानंतर पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच नंतर च्या काळात वातावरण अधून-मधून ढगाळ होते. हि सर्व परिस्थिती बागेत विविध रोगांच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल होती. त्यामुळे बागेत केवडा, भुरी, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येईल.तसेच बुरशीचे बीजाणू पाने, काडी याठिकाणी सुप्तावस्थेत असतील. रिकट घेतल्यानंतर अनुकूल वातावरण मिळाल्यास ह्या सर्व रोगांचा प्रादुर्भाव नवीन फुटींवर होऊ शकतो. त्यामुळे रिकट अगोदर शिफारशीमध्ये बुरशीनाशकांचा वापर करावा.

काडीची परिपक्वता महत्वाची

बागेत रिकट घेत असताना कलम जोडाच्यावर किमान ७ ते ८ डोळे प्रत्येक काडीवर परिपक्व असणे आवश्यक आहे. परंतु या वर्षी असलेल्या प्रतिकूल वातावरणामुळे, रोगांच्या प्रादुर्भावामुळे काही बागेत काडीच्या परीपक्वतेसाठी अडचण आली. अशा बागेत पालाशयुक्त खतांचा फवारणीद्वारे, जमिनीतून वापर उपयुक्त ठरेल.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

साधारणतः री-कट घेण्याच्या १५ दिवस अगोदर  दोन कलमांच्या मध्ये तीन-चार इंच खोल अशी चारी घ्यावी. या चारीमध्ये जवळपास १० किलो कुजलेले शेणखत टाकून त्यावर १५०-२०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, प्रति एकरी २५-३० किलो डीएपी आणि माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून ही चारी मातीच्या थराने झाकून घ्यावी. यामुळे दोन वेलीच्या मध्यात बोद तयार होईल. या बोदामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे नवीन मुळी लवकर तयार होईल व ही मुळी कार्यक्षम अशी असेल.

पानगळ करणे

री-कट घेण्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर कलम जोडाच्या वरची सात ते आठ पाने हाताने अथवा इथेफोन चा वापर करून गाळून घ्यावीत. यामुळे ज्या ठिकाणी री-कट घ्यायचा आहे, त्या भागातील डोळे तापतील आणि फुगतील. अशा डोळ्यांमधून फूट लवकर व एकसारखी निघण्यास मदत होते.


बागेत री-कटची योग्य वेळ
 

रिकट नंतर बाग फुटण्याकरिता वातावरणात विशिष्ट तापमान व आद्रता असणे गरजेचे असते. ठराविक तापमानामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली होत असतात. बागेतील किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस पुढे असल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली योग्य प्रकारे होत असतात. तेव्हा री-कट साधारणत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेणे योग्य राहील. अशाप्रकारे रिकटची पूर्ण पूर्वतयारी झाल्यानंतर योग्य वातावरणात कलम जोडाच्या वर काडीच्या परीपक्वतेनुसार ३-४ डोळे ठेऊन रिकट घ्यावा.

रिकट नंतरचे व्यवस्थापन

  • हायड्रोजन सायनामाईडचा वापर
    री-कट घेतलेल्या बागेत एकसारखे व लवकर डोळे फुटण्याच्या दृष्टीने हायड्रोजन सायनामाईडचा वापर करणे गरजेचे आहे. काडीची जाडी, डोळ्यांची परिस्थिती व वातावरणातील तापमान या गोष्टींचा विचार करून तज्ञांचा सल्ला घेऊन हायड्रोजन सायनामाईडची मात्रा घ्यावीसाधारणपणे ३५-४० मी.ली हायड्रोजन सायनामाईड प्रती १ ली पाण्यात घेऊन योग्यप्रकारे पेस्ट लावावी.
  • कलम काड्यांची बांधणी
    रिकट झाल्यानंतर गरजेनुसार कलम काड्या बांबूला सुतळीच्या सहायाने व्यवस्थित बांधून घ्याव्या. तसेच खुंटाला असलेल्या फुटी काढून टाकाव्या.

कीड व रोग व्यवस्थापन 

रिकट नंतर ८-१० दिवसांनी डोळे फुगन्यास सुरवात होईल. या अवस्थेत उडद्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही कीड फुगलेला डोळा पोखरून त्यामधून निघणारी फूट संपवते. त्यामुळे या किडीचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लॅमडा सायलोथ्रीन ५ मी.ली प्रती १० ली पाणी किंवा इमिडाक्लोरोप्रीड ४ मी.ली प्रती १० ली पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

अशाप्रकारे रिकट पूर्वतयारी करून नंतर व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास वेलींची एकसारखी वाढ होऊन पूर्ण बागेत ओलांडे, मालकाडी हे एकाच वेळी तयार होऊन पहिल्याच वर्षी चांगले उत्पादन मिळू शकते.

लेखक:
प्रा. योगेश भगुरे 

(कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)
९९२२४१४८७३

English Summary: Pre planing and management of recut in new grape vineyard Published on: 20 April 2020, 07:39 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters