1. सरकारी योजना

Government Schemes: शेतकऱ्यांसाठी या आहेत महत्वपूर्ण योजना जाणून घ्या माहिती

केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे आणि शेती करताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे हा या योजनांचा उद्देश आहे.या योजनांद्वारे शेतकऱ्यांना अनेक प्रकारची मदत मिळते. कोणकोणत्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात आणि शेतीशी संबंधित इतर कामातही मदत करतात ते जाणून घेऊया.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Government Schemes

Government Schemes

केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे आणि शेती करताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे हा या योजनांचा उद्देश आहे.या योजनांद्वारे शेतकऱ्यांना अनेक प्रकारची मदत मिळते. कोणकोणत्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात आणि शेतीशी संबंधित इतर कामातही मदत करतात ते जाणून घेऊया.

पीएम किसान सन्मान निधी योजना -
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आहे व शेतीयोग्य जमीन असलेल्या देशभरातील सर्व शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देणे. या योजनेंतर्गत, प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन मासिक हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेसाठी पात्र शेतकरी अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

पीएम किसान मानधन योजना - 
पीएम किसान मानधन योजनेंतर्गत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांना 3,000 रुपये पेन्शन देत आहे. या योजनेसाठी केवळ १८ ते ४० वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या कार्यक्रमासाठी अर्ज केल्यास. यामुळे तुम्हाला दरमहा ५५ रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी अर्ज केल्यास तुम्हाला दरमहा २०० रुपये गुंतवावे लागतील. जेव्हा शेतकरी वयाची 60 वर्षे पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या खात्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन पाठवले जाते.या योजनेत गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते.

प्रधानमंत्री कुसुम योजना -
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना शेतात सौरपंप बसवण्यासाठी ६० टक्के अनुदान आणि ३० टक्के कर्ज दिले जाते. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा कूपनलिका बसवू शकतात.

पंतप्रधान पीक विमा योजना - 
सन २०१६ पासून च्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पुरेसा पाऊस न पडणे, एखादी नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळाचा धोका, दुष्काळ किंवा पिकांवर एखाद्या किडीचा जास्त प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा प्रकारचे नुकसान जर झाले तर शेतकऱ्यांना या योजनेमधून विमा कव्हरेज दिले जाते.

English Summary: Here are important schemes for farmers know information Published on: 20 October 2023, 06:36 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters