1. कृषीपीडिया

हो बरं शेतकरीच परत होणार राजा

आज मुलीच्या पालकांची जरी इच्छा असली सरकारी नोकरी पाहिजे सरकारी नोकरीं बगुन मुलगी देत असाल तर पुढच्या पिडीला भीक मागायची वेळ येईल.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हो बरं शेतकरीच परत होणार राजा

हो बरं शेतकरीच परत होणार राजा

मुलाला पण आजच सरकारी नोकरी शंभर मुलांना पैकी फक्त पाच मुलं सरकारी नोकरी ला आहे, आज तरी पाच मुलांना सरकारी नोकरी आहे पण अजून येत्या पाच वर्षा नंतर सरकारी नोकरी ही एक हि मुलाला मिळणार नाही आजच सत्तर टक्के झाले आहे आणि सरकारने सरकारी शेत्राचे खजिकरणाचा सपाटा लावला आहे येत्या दहा वर्षात सर्व पंचांनो टक्के खाजगीकरण करणं होईल हे कटू सत्य आहे. फक्त पोलीस व आर्मी खात सरकारी राहील त्यात पण कमालीचा बदल होईल ज्या ठिकाणी पन्नास पोलीस काम करता तेथ फक्त पाच पोलीस लागतील याला कारण विन्यान आहे आज पन्नास टक्के लोकं CCTV कॅमेऱ्यात आहे, परिणामी माणुस्य बळ कमी लागते. सिंगल वर पोलीस उभे राहायचे तिथे कॅमेरा असेल, म्हणजे आज पोलीस भरती पाच वर्षात पाच हजार जागा निघतात त्या पुडिल दहा वर्षात तेवढ्या दोन हजार निघतील एक मुलगा भरती झाल्यानंतर वयाच्या साठ्ठ वर्षा परेत काम करतो. परिणाम सरकारी नोकरी हि 98 % हद्द पार होईल. नोकरींवाला शेती विकत घेऊ शकत नाही हे कटू सत्य आहे उलट शहरात घर घेण्यासाठी गावाकडील शेती विकून टाकतो.परिणामी भूमिहीन होतो. पुढे त्यांना जे मुलं होतील त्यांना सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी भेटणार नाही मग त्या मुलांना रस्त्यावर भीक मागायची वेळ येईल.शेती हा उत्तम व्येवसाय आहे पिडून पिढ्या टिकणारा व्येवसाय आहे म्हूणन शेतकरी मुलाची निवड करा 

खाजगी क्षेत्रातील नोकरी खाजगी नोकरी हि बिनबुडाची नोकरी आहे, आज आहे उद्या नाही पगार कमी व रुबाब जास्त ऐकवा लागतो अशी हि बिनबुडाची नोकरीं, पॅकज असते त्यांना तीन लाख, पाच लाख, सात लाख, हे वार्षिक पॅकज त्यात रूम भाडे, लाईट बिल, पानपट्टी, गॅस टाकी, पेट्रोल, मोबाईल रिचार्ज, टीव्ही चा रिचार्ज, बयूटीपार्लर, सर्व खर्चची बेरीज केली तर महिन्याला कमीत कमी वीस हजार खर्च होतो. आज इजिनिअर ला पंधरा, वीस हजार पगार आहे पाच हजार पगार वाढ होण्यासाठी पाच वर्ष लागत्या. आज आज प्रेत्येक गावात पन्नास पोर इजिनिअर आहे, त्या मुळे बरेच इजिनिअर पोर गावात काट्यावर बसले दिसतात,कोणतीही प्रहिव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये तीन हजार पेक्षा जास्त कामगार नाही आजच्या स्थिती मध्ये भविष्यात वाढत्या यांत्री कि कारना मुळे ज्या ठिकाणी वीस लोकं काम करताय तिथे फक्त दोन लोकं काम करणार खाजगी क्षेत्रात टार्गेट नावाची एक स्पर्धा सुरु झाली त्यात दिवसाचे, महिन्याचे, वर्षाचे टार्गेट दिलेले असते ते टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात स्व:ताची फॅमिली ला वेळ देऊ शकत नाही, नातेवाईक च्या सुख दुःखात सभागी होऊ शकत नाही, 

नातेवाईक च्या सुख दुःखात सभागी होऊ शकत नाही, येवढे करून पण टार्गेट पूर्ण होत नाही परिणामी पगार वाढ होत नाही प्रमोशन होत नाही बॉस चे बोलणे ऐकावे लागते आणि तो राग घरी आल्यावर पत्नी वर काढतो त्याचा परिणाम म्हणून डिहोस चे प्रमाण वाढलेले आपल्या दिसून येत आहे,हि नोकरी पीडिजात नाही, पुढे येण्याऱ्या काही वर्षनी इजिनिअर पोरांना शर्टींग करून भीक मागायची वेळ येईल कारण कोणतीच कंपनी गेट वर सुद्धा उभी करणार नाही.कोणत्याच कंपनी मध्ये कामगार वाढवत नाही उलट कामगार कपात सुरु आहे .पुढे खुप वाईट दिवस खाजगी क्षेत्रातील लोकांवर येतील. उलट त्या खाजगी नोकरीच्या नादी लागून गावाकडील शेती विकून शहरात प्लॅट घेण्यासाठी बायकोचे ऐकून गावाकडील शेती विकून टाकतात परिणामी भूमिहीन होतात व पुढे त्यांना जे मुलं होणार आहे त्यांना कोणतीच नोकरीं राहणार नाही मग शिक्षण असून सुद्धा शर्टींग करून भीक मागायची वेळ त्या मुलानं वर येईल हे दिवस लांब नाही. म्हूणन शेतकरी मुलाची निवड करा.शेती हा विषय असा आहे त्या वर आपल्या मागच्या पिढ्यानी पोट भरले आणि पुढे येणाऱ्या पिढ्या हि शेती वर पोट भरतील. शेती हा उत्तम व टिकाऊ व्येवसाय आहे व्यवसाय बेरेच लोकं व्येवसाय कडे वळत आहे पण कोरोना सारख्या भयकर आजारात व्येवसायचे काय हाल झाले ते आपण बघितले, जे निवळ व्येवसाया वर अवलंबून आहे त्यांचे खायचे वांदे झाले होते,

व्येवसाय हा दहा वर्षात नामशेस होईल त्याचे भविष्य मी आपल्या समोर ठेवतो,पहिले गावात दोन दुकान होते आता गल्लीत पाच दुकान आहे परिणामी गिराइक कमी झाले, पेट्रोल पंप पंचवीस किलोमीटर होता पहिले दहा वर्षापूर्वी आता पाच किलोमीटर वर आहे भविष्यात एक किलोमीटर राहील. रसाचे दुकान प्रत्येक लिंबाच्या झाडाखाली आहे, कापड दुकान, मोबाईल दुकान कुठली सेल्लिंग ची दुकान त्याच भविष्य हे अंधारात आहे कारण ऑनलाईन शॉपिंग कंपनी आज होलसेल व ग्राहकांना त्यांच्या घरा परेंत सेवा देत आहे त्या मुळे येत्या दहा वर्षा नंतर हे सर्व व्येसाय बंद किंवा मंद अवस्तेत आपल्या दिसतील. शेती हा व्येवसाय कधी बंद होत नाही, नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातुन सावरण्याची ताकद त्या शेतकऱ्यात आहे शेती हा उत्तम व टिकाऊ व्येसाय आहे त्याला जगातील कोणतीच कंपनी त्याला टक्कर देऊ शकत नाही कि त्याला कॉम्पिटिशन नाही.शेतकरी हा उत्तम व्येवसायिक आहे शेती हा खानदानी व्येवसाय आहे, पहिले शेती व्येवसाय हा वरिष्ठ नोकरी हा कानिष्ठ मानला जायचा, आज हि शेती व्येवसाय वरिष्ठच आहे फक्त कष्ट नोको म्हणून नोकरी वरिष्ठ वाटायला लागली, हेच कटू सत्य आहे पण शेती हा व्येवसाय पहिल्या सारखा कस्टचा नाही राहिला त्यात कमालीचा बदल झाला आहे यांत्रीकि करणामुळे अनेक काम सोपे झाले आहे. शेती हा व्येवसाय पूर्वी पासून सुरु आहे म्हूणन भारत देश हा सत्तर टक्के कृषी प्रधान आहे. शेती व्येवसाय हा पिडून पिढ्या टिकणारा आहे आज तुम्ही करतताय उद्या तूमचे मुलं करतील तो न बंद होणारा व्येसाय आहे, आज कोणताच शेतकरी जमीन विकायला तयार नाही, असली कोणाची विकाऊ तरी एक पण नोकरीवाला शेती विकत घेऊ शकत नाही अगदी बारा लाख रु प्याकेज असेल तरी दोन एक शेती घेऊ शकत नाही, 

शेतकरी हा उत्तमव टिकाऊ व्येवसाय आहे, भविष्यात नोकरीं कोणतीच राहणार नाही म्हणून शेतकऱ्याला महत्व येणार आहे, शेतकरी मुलाची किमत येत्या सात वर्षात आपल्या कळेल. त्या वेळेस आपल्या कडे पस्तावा शिल्क राहील. आज हि कित्येक मुलं हि फक्त लग्न करण्यासाठी साठी कंपनीत कामाला गेली आहे हे लग्न झाले कि एक मुलं झालं कि घरी येतात मग आपण भामटे होतो. तर काही लोकं मग मुलीची फारकत घेतात आणि समाजत इजत घालून घेतात. त्या पेक्षा आजच शेतकरी मुलगा निवडा तीन एकर पाच एक शेती असेल मुलगा निर्वेसनी असेल शेती हंगामी बागायती असेल तरी तो पाच ते सात लाखच उत्पन्न काढतो. जास्त शेती हि कोणाडे राहिली नाही म्हणून सात एकर बारा एक हा विषय सोडून द्या. गावातून एक किंवा दोन मुलांना पाच एकर शेती वाट्याला येती जेवडी जास्त शेती तेवढच कस्ट जास्त, खर्च जास्त, नुकसान झाले तर ते जास्त प्रमाणात होते. शेती ह्या व्येवसात कोणाचा रुबाब आयकायची गरज नाही, टार्गेट नाही, कोणी आपले मालक नाही, कॉम्पिटिशन नाही, व्येवसाय कायम स्वरूपी टिकाऊ, शेतात थोडे फार काम केल्यामुळे शरीर मजुबूत राहते, प्रदूषण मुक्त हवा, लॉकडाउन असले तरी पाच किलोमीटर परेंत शेतात फिरा, सर्व भाजीपाला,दुध, आपल्याच शेतातील उपलब्ध, घर भाडे नाही, पानपट्टी नाही, ग्रामीण भागतील मज्या जरा वेगळीच आहे, सर्व गाव ओळखीचं. सिटी मध्ये कोण शेजारी राहते हे माहिती नसते. शेतकरी हा परत राज होणार आहे फक्त पाच वर्ष वेळ आहे म्हूणन शेतकरीच मुलगा निवडा आयष्यच कल्याण होईल.शेतकरी हा परत राजा होणार आहे कारण त्यांना जे मुलं होती ते परत शेती करतील कारण त्यांना वरील सांगितल्या प्रमाणे रस्त्यावर भीक मागचयची वेळ येणार नाही शेती असल्यामुळे

English Summary: Yes, the farmer will be the king again Published on: 02 May 2022, 11:14 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters