MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

वाचा की चांगले बी-बियाणे व जोमदार रोपटी कशी होतात?

आपण केवळ हौशी परसबाग सांभाळणारे आहात की व्यावसायिक दृष्ट्या रोपवाटिका (नर्सरी) चालवता?

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वाचा की चांगले बी-बियाणे व जोमदार रोपटी कशी होतात?

वाचा की चांगले बी-बियाणे व जोमदार रोपटी कशी होतात?

आपण केवळ हौशी परसबाग सांभाळणारे आहात की व्यावसायिक दृष्ट्या रोपवाटिका (नर्सरी) चालवता? काहीही असले तरी बागमासाठी पूर्ण ज्ञान आवश्यक असते.

कोणताही व्यवसाय, छंद जोपासला तरी त्यात अडचणी येतातच. अडचणीवर मात करूनच यशस्वी होता येते. बाग असो वा शेती, जर बी-बियाणे खात्रीचे असेल तरच उत्पन्न हाती येते. याकरिता नेहमी चांगले बी-बियाणेच वापरावे. म्हणजे उत्पन्न केलेल्या फळे, फुले व पालेभाज्यांमध्ये गुणवत्ता उतरेल. अशा फुलेफळे, भाज्या पाहून व खाताना मनाला प्रसन्नता येईल.

चांगल्या बी-बियाणांबद्दल काही मुद्दे ः-

1) निवडलेले / घेतलेले बी-बियाणे वजन, रंग-रुप तसेच आकार याबाबतीत योग्य असावे.

2) योग्य बीज चांगल्या प्रकारे अंकुरित होऊन बहरते व फळे-फुले देते.

3) बीज स्वच्छ, एका आकाराचे असावे, त्यात कचरा, कोंडा, इतर बीज नसावे.

4) बी-बियाणे पूर्णपणे वाळलेले असावे. ते ओलसर नसावे. म्हणजे काही दिवस ठेवले तरी त्यांना बुरशी-भुरा लागणार नाही.

5) बीज निरोगी असले पाहिजे. तुकडा पडलेले, किडीने खाल्‍लेले व खूप जुने नसावे. किडक्या बीजाचे अंकुरण चांगले होत नाही. त्यामुळे श्रम वाया जातात. बी अंकुरले तरी ते मरते.

6) तुम्ही बी-बियाणे खरेदी करत असाल किंवा पेरत असाल तर त्या बी-बियाणांचा आकार-प्रकार एकसारखा असावा म्हणजे रोपटी एकसमान व सुदृढ होतील.

अंकुरण्याची टक्केवारी ः-

चांगले बी-बियाणे म्हणजे पेरल्यावर 60 ते 70 टक्के उगवून येते ते. कधीही 100 टक्के अंकुरण होत नसते. परंतु 60टक्क्यांपेक्षा कमी अंकुरण झाल्यास ते बी-बियाणे योग्य मानले जात नाही.

जुने बी-बियाणे टाळाः-

जुने बी-बियाणे वापरल्यास त्याचे अंकुरण कमी होते. त्यासाठी नेहमी नवे बीज खरेदी करावे व त्याची पेरणी करावी. नवे बी-बियाणे लवकर उगवूनयेतात. तसेच उगवणीनंतर सर्व रोपटी समान दिसतात.

रोगट व हलके बीज टाळा ः-

बी-बियाणे हाच पीक उत्पादनाचा महत्त्वाचा व मूळ आधार आहे. म्हणूनच बीज खरेदी करताना सावधानता हवी. रोगट, हलक्या प्रतीचे बीज श्रम, पैसा, खत वाया घत्तलवतात. बीज एका आकाराचे असावे. पोचट, संकुचित, आखडलेले बीज वापरल्यास रोपटीही कमजोर व रेागट येतात. ते वारा, उन्ह, पाऊसमारा यांचा सामना करू शकत नाहीत. याकरिता बी-बियाणे चांगले व खात्रीचेच घ्यावे.

आपल्याच शेतातील बी-बियाणे ः-

बरेच शेतकरी आपले पीक घेतल्यानंतर त्यातील चांगले,टपोरे बी-बियाणे निवडून पुढील पेरणीसाठी रोगप्रतिबंधक संस्कार करून जपून ठेवतात. तर काही शेतकरी केवह चांगल्या बियाण्यांसाठी शेती करतात आणि बियाणे विक्री करतात.

मातीचे गादी वाफे व आळे तयार करणे ः-

शेतातून पाटाचे पाणी वाहण्यासाठी व्ही आकाराचे मातीचे गादी वाफे तयार केले जातात. वरच्या फुगीर मातीत बी-बियाणे पेरतात तर खालच्या यू आकारातून पाणी वाहते ग्रामीण भागात पाणी पुरवठा संस्था शेताला पाणी देण्याच्या तारखा शेतकर्‍यांना नेमून देत असतात. या गादी वाफ्यामुळेच शेतात चौफेर पाणी फिरते. शेतकरी याला दारीधरणे म्हणतात. तर आळे हे गोल असते. त्यात झाड किंवा रोपटी लावतात. आळ्याला खोडाच्या मुळाशी घमेल्यासारखा खळगा असल्याने जलसिंचनाचे पाणी साचते व रोपाच्या/झाडाच्या मुळापर्यंत पोहोचते. ही आळी व गादीवाफे पिकासाठी कसे तयार

असावेत/करावेत यासंबंधी काही मुद्दे-

1) गादी वाफ्यात वा आळ्यात वाढणारे निरुपयोगी गवत व इतर रोपटी काढून टाकावीत.

2 ) जिथे बीज पेरले आहे त्या चढावर सेंद्रीय खत किंवा रासायनिक खत फवारावे. म्हणज ेरेापटी तरारून वाढतील.

3 ) माती चांगल्या उन्हातील व रोगप्रतिबंधक औषधे दिलली असावी म्हणजे रोगजंतू वा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.

4 ) दरवर्षी तेच ते पीक घेऊ नये. नेहमी आलटून-पालटून शेती करावी. पीकचक्र बदलते असावे.

5) शेतातील माती जेवढी बारीक व नांगरटीने खणलेली असे तर ती पीकवाढीला उत्तम असते.

6) शेती कसत/करत असताना रोपाच्या बाल्यावस्थेत व उभ्या पिकाला पाणी कमी पडू देऊ नये. पाण्याचा ताण शेतपिकाला हानिकारक असतो.

7) शेतात चौफेर जलसिंचन अथवा पाटाचे पाणी फिरले पाहिजे. तसेच जादा झालेले पाणी साचून राहणेही योग्य नाही.

बी-बियाणे साठवणुकीचा कालावधी ः-

बी-बियाणे जास्तीत जास्त किती कालावधीपर्यंत साठवणुकीने ठेवू शकतो याबद्दल काही मुद्दे.

1) एक वर्षापर्यंत यांचे बी ठेवूशकतो – कांदा, लसूण, पार्सनिप वगैरे.

2) दोन वर्षांपर्यंत ठेवण्यायोग्य बीज- भेंडी, गाजर, ढब्बू मिरची इ.

3) तीन वर्षांपर्यंत ठेवण्यायोग्य बीज- मटार, मुळा, बीट इ.

4) तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठेवण्यायोग्य बीज – खरबूज, काशीफळ, भोपळा, टोमॅटो, कोबी, नवलकोल, टरबूज, कलिंगड इ.

रोपटे तयसार करणे ः-

जर तुम्ही स्वतः बी पेरून रोपटे तयार करणार असाल तर ते रोपटे सुदृढ असणार कारण की चांगले, देखभाल चांगली तर रोपटेही गुणवत्तेचे असेल.

तुम्ही रोपटे तयार करू शकणार नसाल तर रोपवाटिकेतून (नर्सरी) ते विकत घ्या. कृषी विभाग किंवा कृषी महाविद्यालयातून जर रोपटे मिळाले तर उत्तमच.

खरेदी केलेले रोपटे कसे असावे?

रोपवाटिकेतून रोपटे खरेदी करताना ते कसे असावे याबद्दल काही मुद्दे-

1) रोपटे खूप लहान असू नये. लहान रोपटे वाळून जाण्याचे भय असते.

2) रोपट्याची पाने पिवळी नसवीत, रोपटे रोगट नसावे. पाने हिरवी असावीत.

3) रोपटे सशक्‍त असावे, पातळ नसावे. पातळ रोपटे लवकर वाढत नाही.

4) रोपटे खात्रीच्या रोपवाटिकेतूनच खरेदी करावे. किंमत जास्त वाटते म्हणून हलके, पातळ, रोगट रोपटे घेऊ नका.

5) रोपटे बागेत/शेतात लावण्यापूर्वी ते रोगप्रतिबंधक द्रावणात बुडवून मग रोपावे/लावावे.

6) कमी आयुष्याचे व दीर्घ आयुष्याचे कुठलेही रोपटे घ्या, पण ते सशक्‍त असावे. तरच चांगले बी मिळवाल व श्रम सार्थकी लागतील. यात तडजोड नसावी.

7) रोपटे एका ठिकाणाहून उपटून दुसरीकडे लावणार असाल तर हे काम झटपट उरका. उशीर कराल तर रोपटे सशक्‍त, सुदृढ असावीत. यात कोणतीही तडजोउ नसावी. बेपर्वाई, दुर्लक्ष या बाबी नुकसान करतील. हुशार शेतकरी नेहमी चांगले बी-बियाणे व सशक्‍त रोपटी जोपासत असतो.

English Summary: Read about how to grow good seeds and vigorous plants. Published on: 12 April 2022, 09:07 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters