
शेतकऱ्यासाठी सर्वस्व उपयुक्त अशी नॅनो टेक्नॉलॉजी ची नवीन प्रणाली ! या बद्दल जाणून घ्या खाली सविस्तर माहिती.
जागतिक लोकसंख्या मध्ये वाढ होत आहे त्यासोबतच अन्नाची मागणी ही वाढत चालली आहे.आज शेतकरी अन्न उत्पादन वाढविण्यात भर देत आहे. हातावर शेतकऱ्यांना यामध्ये मदत करण्यासाठी सरकार नवीन नवीन योजना व तंत्रज्ञान याच निर्माण करत आहे. शेतकऱ्याच्या सर्वात मोठं आव्हान म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अन्नाचे उत्पादन करणे व यासाठी त्याला अनेक गोष्टींच्या सामोरे जावे लागते.अब्जांश तंत्रज्ञान म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान अण्णा उत्पादनाशी निगडित आव्हाने कमी करण्यास मदत करते.
गुणवत्तापूर्ण बियाणाचे विकसन, पिकांचे संवर्धन, विविध रोग व तृणवाढ यांपासून पिकांचे संरक्षण अशा अनेक बाबतीत अब्जांश तंत्रज्ञान उपयुक्त आहे तसेच कुक्कुट-पालन, गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांचे पालन इत्यादी पूरक व्यवसायांमध्ये देखील अब्जांश तंत्रज्ञान उपयुक्त आहे.
नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर :
• अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या अन्न पदार्थांना सर्वसाधारणपणे ‘अब्जांश अन्न’ असे म्हणतात. अन्नाचे पोषण ( Nutrients)मूल्य कमी होणार नाही याची दक्षता घेवून या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अन्नातील घटकांचा पोत व अन्नाची चव यामध्ये आवडीनुसार आवश्यक ते बदल करता येतात. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशवंत फळे, भाज्या व फुले यांचा टिकाऊपणा व ताजेपणा सुद्धा वाढवता येतो व अन्नाची वाहतुक करतेवेळी ही गोष्ट अत्यंत आवश्यक असते.
• सिंचनाच्या पाण्याचे शुद्धीकरण ( Drip/ Sprinkle Irrigation):
शेतकरी जवळ सिंचनाचे पाणी देतो त्या पाण्यात अनेक प्रकारचे रोगराई व जंतू असतात व तेच पाणी पिकांना दिल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते.यावर उपाय योजना म्हणून लागवडीचे मोठे क्षेत्र असणा-या शेतीमध्ये अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सिंचनाचे पाणी गाळून वापरण्याची पद्धत आता वापरली जात आहे. कार्बनी अब्जांश नलिका , सच्छिद्र अब्जांश सिरॅमिक (Nanoporous ceramic) व चुंबकीय अब्जांश पदार्थ यापासून बनवलेल्या पापुद्रिक गाळण्या (Membrane filters) यांचा वापर करून सिंचनाचे पाणी गाळले जाते. या प्रक्रियेमध्ये पाण्यांतील रोगजंतू मारले जातात. व यामुळे शेतकऱ्यांना चांगले पोषक पाणी सिंचनासाठी भेटते.
• कृषी अवजारांची झीज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
कृषी अवजार शेतात काम करून करून वेगवेगळ्या तत्वांचा संपर्कात येत असतात व त्यामुळे त्यांची दररोज झीज होण्याची क्षमता वाढत असते. अशा कृषी अवजारांना पृष्ठभागावर व बॉल बेअरिंगवर साठी अब्जांश कणांचा जैवसंवेदनशील पदार्थांचा लेप दिला जातो. व त्यामुळे अवजारांची झीज कमी होण्यासाठी सहाय्य मिळते.
अशा प्रकारे या नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये होत आहे व वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो.
Share your comments