1. कृषीपीडिया

आंतरपीक पद्धती आहे शेतकऱ्यांसाठी उपयोगी, हे होतात आंतरपीक पद्धतीचे फायदे

आज शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन जर ठेवला तर आर्थिक नियोजन आणि नफा तोटा या सर्व गोष्टी पर्यायाने बघाव्या लागतात.सर्वच शेतकरी बंधू, हल्ली शास्त्रीय पद्धतीने आंतरपीक / मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
intercroping method

intercroping method

आज शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन जर ठेवला तर आर्थिक नियोजन आणि नफा तोटा या सर्व गोष्टी पर्यायाने बघाव्या लागतात.सर्वच शेतकरी बंधू, हल्ली शास्त्रीय पद्धतीने आंतरपीक / मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.

आंतरपीक पद्धती आणि मिश्र पिका चा उद्देश एकच आहे परंतु, अवलंब करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मिश्र पीक पद्धती मध्ये पेरणीच्या वेळी मुख्य पिकाच्या बियाण्यात ठराविक प्रमाणात दुय्यम पिकाचे बियाणे मिसळून ते ओळीत पेरले जाते, त्यामुळे एकाच ओळीत मुख्य पिकाची आणि दुय्यम पिकाची रोपे उगवतात. आणि पुढे आपला जीवन क्रम पूर्ण करतात शास्त्रीय पद्धतीने दुय्यम पिकात मुख्य पीक किंवा आंतरपीक घ्यायचे असल्यास मुख्य पिकाच्या ठराविक ओळीनंतर स्वतंत्ररित्या दुय्यम किंवा आंतरपिकाच्या ठराविक ओळी पेरतात.

 यालाच आंतरपीक पद्धती असे म्हणतात शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून प्रयोगाअंती मुख्य पिकाच्या किती ओळी नंतर आंतरपिकाच्या किती ओळी पेराव्यात म्हणजे अधिक आर्थिक नफा मिळतो याचे संशोधनाअंती निष्कर्ष काढले जातात आणि अधिक आर्थिक नफा देणाऱ्या आंतरपीक पद्धतीची शिफारस केली जाते. अशा पद्धतीने पेरणी केलेल्या शेताचे जवळपास 70 ते 80 टक्के क्षेत्र मुख्य पिकाखाली तर 20 ते 30 टक्के क्षेत्र आंतर पिकाखाली असते.

  • आंतरपिकाचे जलसंधारणात महत्व :-

 मूलस्थानी जलसंधारण म्हणजे जागच्याजागी म्हणजेच शेतातल्या  शेतात पावसाचे पाणी मुरवणे होय.कोरडवाहू शेती मध्ये पावसाच्या पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. पाणी आडवा - पाणी जिरवा हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरते.

( कपाशी+ सोयाबीन ) ही आंतरपीक पद्धती खोल मशागत करून उताराला आडवी पेरणी केल्यास पावसाच्या पाण्याचा अपधाव उथळ मशागती पेक्षा 12.74 टक्के कमी होता. तसेच जमिनीची धूप 17.76 टक्‍क्‍यांनी कमी होते. आणि सोयाबीन तसेच कापसाचे उत्पादन 38.95 टक्‍क्‍यांनी वाढते. म्हणजेच(कापूस+सोयाबीन) या आंतरपीक पद्धतीमुळे मृदा व जलसंधारणासमदत होते.

  • आंतरपिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्व :-

 आंतरपीक / मिश्रपीक पद्धतीचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान आहे. विविध आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धती मुळे मुख्य पिकांवर येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य आहे.मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. याच आंतरपिकाचा वापर, पक्षी थांबे म्हणून सुद्धा करतात. आणि यावर बसून पिकातील अळ्या वेचून खातात.

  • आंतरपिकाचे आपत्कालीन पीक नियोजनात महत्त्व :-

 निसर्ग हा आपल्या हातचा नाही. पाऊस वेळेवर येणे, न येणे, मध्येच मोठीउघडीप पडणे, पाऊस उशिरा येणे, तसेच पाऊस सारखा लागून पडल्यास शेतकऱ्यांना पेरणी करण्यास नाकीनऊ येतात. अशा परिस्थितीत आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते. त्याकरिता, शेतकरी बंधुंनी, सुचविल्याप्रमाणे आंतरपीक पद्धती अमलात आणावी नियमित पावसाळा दोन किंवा तीन आठवडे सुरू झाल्यास म्हणजेच दोन ते पंधरा जुलै दरम्यान सुरु झाल्यास कपाशी मूग, उडीद सोयाबीन या पिकांचाआंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा.

आणि संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता, थोड्या थोड्या क्षेत्रावर ही पिके घ्यावीत. काही क्षेत्रावर ( कापूस+ ज्वारी+ तुर + ज्वारी ) 6:1:2:1 किंवा 3:1:1:1या ओळींच्या प्रमाणात घ्यावी. त्यामुळे एकूण उत्पादन आणिउत्पन्नात अधिक फायदा होतो.सोयाबीन पिकात2,6 किंवा 9 ओळींनंतर 1 ओळ तुरीची आपल्या सोयीनुसार घ्यावे. नियमित पावसाळा पाच आठवड्यापेक्षा जास्त उशिरा सुरू झाल्यास म्हणजेच 23 ते 29 जुलै दरम्यान पाऊस आल्यास कापसाची पेरणी करणे टाळावे. परंतु काही क्षेत्रावर कापसाची पेरणी करणे अनिवार्य असल्यास केवळ देशी कपाशीचे सरळ आणि सुधारित वाण वापरावे. तसेच कापसाच्या ओळींची संख्या कमी करून एक किंवा दोन ओळी तुरीच्या आवर्जून  घ्याव्यात. तसेच इतर पिकात सुद्धा तुरीचे आंतरपीक घ्यावे.

  • आंतरपीक पद्धतीचे फायदे :-
  • मुख्य पिकामध्ये कडधान्य वर्गीय पिकाचे आंतरपीक किंवा मिश्र पीक घेतल्यास बहुतेक कडधान्य वर्गीय पिकांच्यामुळावर असलेल्या गाठी द्वारे वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढूननत्रयुक्त रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येते. तसेच जमिनीची सुपीकता टिकवता येते.
  • मुख्य पिकाची व आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरात वाढत असल्यामुळे आणि प्रत्येकी पिकाची अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असल्यामुळे अन्नद्रव्ये ओलावा इ. साठी तसेच उंची वेगळे असल्यामुळे सूर्यप्रकाश याकरिता स्पर्धा होत नाही
  • मुख्य पीक आणि आंतरपीक किंवा मिश्रपीक पिकाचा जीवनक्रम पूर्ण करण्याच्या कालावधीत भिन्नता असल्यामुळे कापणी करणे सुलभ होते.
  • आंतरपीक किंवा मिश्र पिकामुळे शेतकऱ्यांच्या विविध गरजा उदा. नगदी, तृणधान्य, कडधान्य,गळीत धान्य, जनावरांसाठी चारा जळणा करिता इंधन इत्यादी गरजा भागविल्या जातात.
  • नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पूर्ण सर्व पीक उद्ध्वस्त न होता किमान एका तरी पिकाचे उत्पन्न हाती लागते.
  • कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणाकरिता आंतरपीक/ मिश्र पिकाची मदत होते.
  • वेगवेगळ्या कुटुंबातील पिकांची लागवडआंतरपीक पद्धतीने होत असल्यामुळे आपोआपच त्याच्याशी संलग्न असलेल्या तणांचा तसेच कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • सलग एकाच पिकाखाली शेती न ठेवता मुख्य पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक पद्धती अमलात आणण्यास  केवळ आर्थिक मिळकत अधिक मिळाल्याचे अनेक संशोधनपर प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.
English Summary: intercropping method is very benificial for farmer that get more profit Published on: 27 February 2022, 07:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters