1. कृषीपीडिया

दुष्काळात धुक्याशी लढा

गेल्या आठवड्यापासून हवामानामध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम कांद्याच्या पिकावर होत आहे. तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
दुष्काळात धुक्याशी लढा

दुष्काळात धुक्याशी लढा

गेल्या आठवड्यापासून हवामानामध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम कांद्याच्या पिकावर होत आहे. तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे. पाऊस व थंडीमुळे धुक्याचे प्रमाण वाढले असून कांदा वाचविण्यासाठी दुष्काळात शेतकरी निकराचा लढा देत आहे

गेल्या आठवड्यापासून हवामानामध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम कांद्याच्या पिकावर होत आहे. तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे. पाऊस व थंडीमुळे धुक्याचे प्रमाण वाढले असून कांदा वाचविण्यासाठी दुष्काळात शेतकरी निकराचा लढा देत आहे.

अवकाळी पावसाने जिल्हाभरात चांगलीच हजेरी लावली असून आतापर्यत सरासरी २४ मिलिमीटर नोंद झाली आहे. थंडीही वाढल्याने धुक्याचे प्रमाण वाढत आहे. आठवड्यापासून ढगाळ वातावरण कायम आहे. या खराब हवामानमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांदा पीक संवेदनशील असल्याने रोगराईस लवकर बळी पडते. कांदा पोसण्यास व उत्तम दर्जाचा कांदा तयार होण्यास अनुकुल हवामानाची गरज असते. 

सद्यपरिस्थितीत कांदा उत्पादक क्षेत्रामध्ये धुके, ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार वाढत आहे. काढणीस आलेल्या कांद्यावर धुक्याचा परिणाम होणार नसला तरी उशीरा लागवड केलेल्या कांद्यास या हवामानाचा फटका बसणार आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने व तापमान घटल्यामुळे करपा रोगाचा प्रसार झपाटयाने होत आहे. ढगाळ हवामानामुळे लसूण पिकांवर करपा रोग व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. खराब हवामानामुळे उद्भवलेल्या रोगराईशी सध्या शेतकरी हवामानाशी लढा देत आहे. घरगुती उपायाबरोबरच फवारणी करण्यास प्राधान्य देत आहे. कांद्यावर मावा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसताच कीटकनाशक व बुरशीनाशक एकत्रितरीत्या फवारवा किंवा रोगाच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या औषधाची फवारणी करण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञ देत आहेत.

आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पाऊसही पडत आहे. काही पिकांना पावसाचा चांगला फायदा झाला असला तरी कांद्याला थंडी व धुक्याचा फटका बसत आहे. धुके हटविण्यासाठी विविध उपाय करत महागड्या औषधाची फवारणीही करावी लागत आहे.

- खराब वातावरणा कांदा पिकाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. धुक्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी करावी.

कसे करावेत उपाय:-

- तुषार सिंचनाचा वापर करून सकाळच्या वेळेस पाच ते दहा मिनिटे त्याचा वापर करावा, जेणेकरून पातीवर जमा असलेले दव पाण्याने धुवून जाईल.

- तुषार सिंचन नसल्यास स्प्रे पंपाने पाण्याची फवारणी करावी.

- वाफ्यात अथवा ठिबकवरील कांद्यास सकाळी थोडे पाणी द्यावे.

- रात्री, तसेच पहाटेच्या वेळी शेतात ओले गवत जाळून रात्री धूर करावा.

- सकाळी कडुनिबांच्या पाल्याने, दोरीने किंवा कापडाच्या साह्याने पातीवरील जमलेले दव हटवावे. 

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे

९४०४०७५६२८

English Summary: In drought frost angaist Published on: 08 February 2022, 04:27 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters