1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनो सावधान! पाऊस पडल्यानंतर तूर पिकात करा हे काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Tur Cultivation: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग कामात व्यस्त आहे. मात्र पावसाळ्यातील काही पिके अशी आहेत त्यांची जास्त निगा राखावी लागते. कारण या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्यामुळे वेळोवेळी त्यावर औषध फवारणी करणे गरजेचे असते. पावसाळ्यात तूर पिकावर किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

Tur Cultivation

Tur Cultivation

Tur Cultivation: सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy Days) सुरु झाले आहेत. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी (Farmers) वर्ग कामात व्यस्त आहे. मात्र पावसाळ्यातील काही पिके अशी आहेत त्यांची जास्त निगा राखावी लागते. कारण या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव (Crop disease outbreaks) जास्त असतो.

त्यामुळे वेळोवेळी त्यावर औषध फवारणी (Drug spray) करणे गरजेचे असते. पावसाळ्यात तूर पिकावर (Toor crop) किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. खरीप हंगामातील बहुतांश पिकांची पेरणी व लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तूर पेरणी आगाऊ पावसाळ्याच्या (Pre-monsoon crop) केली होती, त्यांनी पिकावर अधिक देखरेख करणे आवश्यक आहे.

कारण या काळात पीक सुरुवातीच्या अवस्थेत असते. पाऊस पडल्यानंतर शेतात तणांसह किडी व रोगांचा प्रादुर्भावही वाढतो. अशा स्थितीत पिकामध्ये वेळेवर व्यवस्थापनाचे काम होणे गरजेचे आहे. तूर पिकाच्या चांगल्या विकासासाठी सकाळ संध्याकाळ निगराणी व तण काढण्याचे काम करावे लागणार आहे.

शेतकऱ्यांनो लखपती बनायचंय ना! तर बाजार प्रचंड मागणी असणारा हा शेतीव्यवसाय कराच...

तण व्यवस्थापन

अनेकदा असे दिसून येते की 25 ते 30 दिवसांनी तूर पिकासह तणही वाढतात, जे पिकांचे पोषण शोषून घेतात आणि सुरुवातीला झाडे कमकुवत होतात. अशा स्थितीत पेरणीनंतर हेक्टरी 1 ते 1.5 किलो पेंडीमेथालिनची फवारणी शेतात करावी. शेतकऱ्याची इच्छा असल्यास, उगवण झाल्यानंतरच, पेरणीनंतर 20 दिवसांनी 1.25 किलो कुझालोपॅप पी. इथाल किंवा 1 किलो इमाझाथापर पिकावर फवारणी केली जाऊ शकते.

पिकामध्ये वेळोवेळी हाताने तण काढत राहा, त्यामुळे पिकाच्या मुळांमध्ये ऑक्सिजनचा संचार वाढतो आणि तणांचाही नाश होतो. तण काढण्याबरोबरच तूर पिकाच्या संरक्षणासाठी व वाढीसाठी जीवामृत फवारावे. ज्या शेतकऱ्यांनी शेत तयार करताना युरियाचा वापर केला होता, त्यांनी युरियाचा दुसरा डोस पिकामध्ये ३० ते ३५ दिवसांत टाकावा.

भावांनो कमी खर्चात कमवा चौपट नफा! करा हा व्यवसाय आणि बना लखपती

पाण्याची व्यवस्था

तुरीच्या अनेक जाती जास्त पाणी सहन करतात, परंतु पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेतात ओलावा निर्माण करूनच काम केले जाते. अशा स्थितीत पावसाचे पाणी शेतात तुंबून पीक खराब होऊ नये, यासाठी निचरा करण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी 15 ते 20 मीटर अंतरावर नाले तयार करावेत, जेणेकरून तू पिकांमधील सर्व पाणी थेट शेतातून बाहेर पडेल.

कीड व कीटक नियंत्रण

तूर हे पीक पहिल्या काही दिवसांत नाजूक असते. अशा परिस्थितीत पिकावर लक्ष ठेवा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करा. पिकामध्ये कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर सेंद्रिय कीड नियंत्रणाचे काम करा. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचे कीटकनाशक पाण्यात मिसळून ते पिकावर एकदाच शिंपडू शकतात, त्यामुळे पावसात पिकावर वाढणारे बुरशीजन्य रोग व विषाणू नष्ट होतात.

महत्वाच्या बातम्या:
पावसाचे सत्र सुरूच! पुढील ४ दिवस धो धो कोसळणार; आयएमडीने दिला रेड अलर्ट
शेती करायला वावर कशाला! टेरेसवर शेती करून होऊ शकता मालामाल; जाणून घ्या...

English Summary: Do this work in the tur crop after the rains Published on: 25 July 2022, 10:43 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters