1. कृषीपीडिया

मातीचा जीव आहे कर्ब, कुठून उपलब्ध होईल हा कर्ब?

आज गरज आहे मातेचा जीव म्हणजे कर्ब वाढवायची! पण हा कुठे उपलब्ध होईल? मातीमध्ये तो सुपीक मातीत कुजलेल्या त्याच वनस्पती मुळे मातीचे स्वरूप बदलत गेले आहे.हे लक्षात घ्या! आपल्या मातीमध्ये करोड जीव असतात,असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soil curb

soil curb

आज गरज आहे मातेचा जीव म्हणजे कर्ब वाढवायची! पण हा कुठे उपलब्ध होईल? मातीमध्ये तो सुपीक मातीत कुजलेल्या त्याच वनस्पती मुळे मातीचे स्वरूप बदलत गेले आहे.हे लक्षात घ्या! आपल्या मातीमध्ये करोड जीव असतात,असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

आपली जमीन  हा मर्यादित स्वरूपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे.तसेच जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर,पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर इत्यादी गोष्टींचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. पदार्थ आणि खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. मातीच्या या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना माहिती करून देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न झाले तर काही प्रमाणात का होईना माती वाचवता येईल. अन्नधान्याची उत्पादकता वाढवणे अपरिहार्य असल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवणे महत्त्वाचे ठरते.

पिक पेरणी अगोदर जमिनीतल्या अन्नद्रव्याची तपासणी व पिकास आवश्यक असलेल्या एकूण अन्नद्रव्याची आवश्यकता या दोन्ही बाबी विचारात घेऊन पिकास अन्नद्रव्य वेळेवर व योग्य त्या पद्धतीने देणे गरजेचे आहे. उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमीन. अनादी काळापासून शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पूर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकण्याचे प्रमाण जास्त होते.  सहाजिकच त्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास आपोआप मदत होत असे. आता चित्र वेगळे आहे. मूलद्रव्यांच्या असमतोल वापरामुळे मूलद्रव्यांची जमिनीत कमतरता जाणवू लागली आहे. जमिनीला पुरविण्यात येणाऱ्या अन्नद्रव्या पैकी एखाद्याचा अन्नद्रव्य पुरवून जमिनीची सुपीकता वाढत नाही. त्यामुळे रासायनिक खतांची मात्रा देऊनही अलीकडे उत्पादकता वाढीस मर्यादा येत आहेत. शेती आणि अन्नसुरक्षेसाठी मातीमध्ये जैवविविधता अत्यंत गरजेचे आहे.

जर मातीचे अशीच नासधूस होत राहिली तर येणाऱ्या पिढ्यांची अन्नसुरक्षा धोक्यात येईल, तसेच शेती उत्पादन ही घटेल. मातीचे सूक्ष्मजीव जैविक आणि अजैविक घटकांचे पिकांसाठी लागणारी पोषण घटकात रूपांतर करतात. त्यांच्यावर पिकांची वाढ अवलंबून असते. मातीतील जिवाणूमुळे निसर्गाचाही समतोल राखला जातो.पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये दिली जाऊन मातीची सुपीकता राखली जाते. पिकास संतुलित प्रमाणात अन्नद्रव्य पुरवली जातात. अन्नद्रव्यांची जमिनीतील कमतरता हळूहळू कमी होते.खतांचा कार्यक्षम वापर होतो.उत्पादनात वाढ होऊन उत्पादनाचीप्रत सुधारते. म्हणूनच माती वाचवण्यासाठी,मातीचा पोत सुधारण्यासाठी माती सर्वेक्षण, माती परीक्षण या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती देऊन जागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 लेखक

 मिलिंद जि. गोदे

युवा शेतकरी मित्र

English Summary: curb is is soil of land thats useful for soil fertility and more production Published on: 09 January 2022, 05:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters