1. बातम्या

E-Pik Pahani : "ई-पीक पाहणीला" उरले दोन दिवस, नोंदणी तर झालीच नाही याला जबाबदार कोण?

गेल्या खरीप हंगामपासून राज्य सरकारने ‘ई-पीक पाहणी’ सुरु केली. खरीप हंगामात ‘ई-पीक पाहणी’ला चांगला प्रतिसाथ मिळाला. सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, रब्बी हंगामात या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
E-Pik Pahani

E-Pik Pahani

गेल्या खरीप हंगामपासून राज्य सरकारने ‘ई-पीक पाहणी’ सुरु केली. खरीप हंगामात ‘ई-पीक पाहणी’ला चांगला प्रतिसाथ मिळाला. सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, रब्बी हंगामात या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. सरकारने ‘ई-पीक पाहणी’ साठी दोन वेळा मुदतवाढ दिली. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

गेल्या खरीप हंगामापासून महसूल कर्मचारी तलाठी यांची भूमिका शेतकरीच बजावत आहे. ई-पीक पाहणी’ साठी दोन वेळा मुदतवाढ दिली. आता 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. या दोन दिवसात पीक पाहणी होणार आहे का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. रब्बी हंगामात ई-पीक पाहणी झाली नाही. यामुळे आता पिकांचे नुकसान झाले तर आला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा: मोठी बातमी: साखर कारखाने विकण्याऐवजी भाडेतत्त्वावर देणार

रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यल्प सहभाग पाहून 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. गेली दोन महिने कृषी विभागाकडडून जनजागृती केली नाही तर आता अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

English Summary: Two days left for "e-crop inspection" Published on: 26 February 2022, 02:46 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters