1. बातम्या

पावसाचा जोर वाढणार, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील या भागात पावसाचा इशारा...

यंदा पावसाने अनेकांचे अंदाज चुकवले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Rain

Rain

यंदा पावसाने अनेकांचे अंदाज चुकवले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.

असे असताना राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील चार चे पाच दिवसात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे. यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवामृत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? शेतकऱ्यांनो जाणून घ्या..

English Summary: The intensity of rain will increase, there is a warning of rain in this part of the state for the next four to five days... Published on: 15 September 2023, 03:44 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters