1. बातम्या

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा : उपमुख्यमंत्री

पुणे- देशात आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटात शेतकरी अन्नदाता आपले कर्तव्य बजावत आहे. बळीराजाला अधिकचा त्रास होऊ नये यासाठी सरकार विविध उपाय योजना करत आहे.

KJ Staff
KJ Staff


पुणे- देशात आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटात शेतकरी अन्नदाता आपले कर्तव्य बजावत आहे. बळीराजाला अधिकचा त्रास होऊ नये यासाठी सरकार विविध उपाय योजना करत आहे.  आता खरीप हंगाम येत असून राज्य सरकार शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत केली जाईल आणि त्यांच्या अडचणी कशा दूर होतील याचा आढावा घेत आहे. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची कामे सोपी व्हावीत यासाठी सरकार तयारी करत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  ते विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर आदींसह  लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  पुणे जिल्हयात २ लाख ३० हजार ९३७ हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी २६ हजार  क्विंटल बियाणांची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषी निवीष्ठा उपलब्ध करुन देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका. शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी  कृषी विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
source - Loksatta

English Summary: Strict planning of kharif season: Deputy Chief Minister Published on: 01 May 2020, 06:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters