1. बातम्या

अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा; कृषीराज्यमंत्र्यांचा आदेश

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट होत असून याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची माहिती कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सांगलीमध्ये बोलत होते.

KJ Staff
KJ Staff
(प्रतिनिधिक छायाचित्र)

(प्रतिनिधिक छायाचित्र)


राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट होत असून याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची माहिती कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सांगलीमध्ये बोलत होते.

कोरोनाचा कृषी क्षेत्राला बसत असणाऱ्या फटक्याबाबतशी त्यांनी माहिती दिली. कोरोना व्हायरसमुळे जगातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतात व आपल्या राज्यातही याचा परिणाम जाणवत आहे. मात्र, तूर्त कोरोनाच्या परिस्थितीवर मात करणे हे ध्येय आहे. त्यानंतर नुकसानीच्या बाबतीत विचार होईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या संपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर याबाबतीत बोलणे योग्य होईल, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. याचा मोठा फटका फळबागा आणि रब्बी पिकांना बसला आहे. पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, संत्रा, केळी, लिंबू, डाळींब अशा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, गहू, हरभरा, मका या पिकांचीही खराबी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. परभणी, सांगली, लातूर, धुळे, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे.

English Summary: state agriculture minister order for survey compensation Published on: 19 March 2020, 05:16 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters