1. बातम्या

64 वर्षाचे योगगुरु जग्गी वासुदेव यांचा 30 हजार किमीचा दुचाकी प्रवास; मातीची सुरक्षिततेविषयी जागरुकता व्हावी हे उद्दिष्ट

शेती आणि माती या एकमेकांना परस्पर पूरक गोष्टी आहेत. माती सुपीक तर शेती उत्तम हे गणितच आहे. बऱ्याच अंशी मातीच्या सुरक्षिततेविषयी पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sadguru jaggi vasudev start travelled for awareness about soil security

sadguru jaggi vasudev start travelled for awareness about soil security

शेती आणि माती या एकमेकांना परस्पर पूरक गोष्टी आहेत. माती सुपीक तर शेती उत्तम  हे गणितच आहे. बऱ्याच अंशी मातीच्या सुरक्षिततेविषयी पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही.

जमिनीची धूप, बाह्य कारकांचा परिणाम, रासायनिक खतांचा अपरिमित वापर इत्यादी कारणांमुळे मातीची सुपीकता नष्ट होत आहे. त्यामुळे बर्‍याच प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. याच पार्श्वभूमीवर मातीच्या सुरक्षिततेविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी चौसष्ट वर्षाचे योगगुरू सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी युरोप -मध्यपूर्व ते भारत असा सुमारे 30 हजार किमीचा प्रवास दुचाकीवरून करण्याची मोहीम आखली आहे.

नक्की वाचा:धक्कादायक संशोधन:80 टक्के लोकांच्या रक्तात प्लास्टिक, त्यामुळे किडनी फेल आणि वाढतो हार्ट अटॅकचा धोका

या मोहिमेची सुरुवात 21 मार्च पासून लंडन येथील पार्लमेंट स्क्वेअर पासून करण्यात आली. या प्रसंगी हजारोच्या संख्येने पर्यावरण प्रेमी उपस्थित होते व त्यांनीसद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या दुचाकीला झेंडा दाखवला.

या मोहिमेला जवळजवळ शंभर दिवस लागणार असून या कालावधीत अनेक शहरांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहेत. ही मोहीम सुरु करण्या अगोदर उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले की, मी गेल्या 24 वर्षांपासून पर्यावरणावर बोलत आहे, जागरूकता निर्माण करत आहे परंतु आत्ता त्यावर कृती करण्याची वेळ आली आहे. मातीची सुरक्षिततेविषयी चे समस्या ही संपूर्ण जगाला व्यापणारी असून देशादेशातील धोरणांमध्ये समावेश झाल्याशिवाय उत्तर मिळणार नाही. आता वयाच्या 64 व्या वर्षी दुचाकीवरून प्रवास म्हणजे पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु जर गेल्या वर्षाचा विचार केला तर तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. जमिनीच्या सुपीकता चा प्रश्न हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये निर्माण झाला आहे.

नक्की वाचा:अल्लू अर्जुन प्रमाणे दरारा आहे पुष्पाचा! 150 किलो वजन असणाऱ्या पुष्पा बोकडाला खरेदी करण्यासाठी झुंबड

 या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.कॉनशियस प्लॅनेट या कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवली जात असून सेव सोईल मूव्हमेन्ट साठी जागतिक अन्न कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाळवंटीकरण विरोधी मोहिमेने पाठबळ दिले आहे. 

या माध्यमातून जागतिक पातळीवर  नापीक होणारी माती आणि वाळवंटीकरणाचे वाढती समस्या याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले जावे यासाठीच हा प्रयत्न आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मातीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढावे यासाठी राष्ट्रीय धोरण प्रत्येक देशात तयार करून राबविण्यात यावे अशा आशयाचा  लोकमानस या मोहिमेच्या माध्यमातून तयार होईल.

English Summary: sadguru jaggi vasudev start travel by bikr 30 thousand km for awareness about soil fetility Published on: 02 April 2022, 03:32 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters