1. बातम्या

खानदेशात केळीचे भाव दबावातच, मिळत आहे 300 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर

जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. संपुर्ण खानदेश पट्ट्यातच केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या केळी ला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे सुरूच आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
banana crop

banana crop

जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. संपुर्ण खानदेश पट्ट्यातच केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या केळी ला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे सुरूच आहे.

जर केळी पिकाचा विचार केला तर केळी पिकाची कांदेबाग लागवड ही जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, जामनेर तसेच चोपडा तालुक्यात जास्त प्रमाणात होते.या कांदे भागाची काढणीआता पूर्ण होत आली असून केळीची आवक कमी झाली आहे.परंतु तरीदेखील केळीला म्हणावा तेवढा दर मिळत नाहीये.

 खानदेश मध्ये दररोज 170 ट्रक केळीची काढणी सुरू आहे.आवक फारच कमी आहे परंतुकेळीला उत्तरेकडील बाजारपेठेत उठाव नसल्यानेकेळीचे दर कमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

उत्तरेकडील भागात खानदेश मधून दररोज 100 ते 130 ट्रक केळी पाठवली जात आहे.तसेच राज्यातील ठाणे, मुंबई तसेच नागपूर व इतर राज्य जसे की राजस्थान, छत्तीसगड येथे केळी पाठवली जात आहे.पंजाब, काश्मीर आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये असलेली थंडी आणि पावसामुळे केळी पाठवण्यात अडचणी येत आहेत.

तेथेही केळीची मागणी खूपच कमी असल्याने केळी भावावर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात उत्तरेकडे केळीला उठाव वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आता कांदेबाग काढणीनंतर फेब्रुवारीच्या अखेरीस येणाऱ्या नवती केळीच्या काढणीला वेग येईल, त्यावेळेस भावामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

English Summary: rate of banana crop is 300 to 800 hundread rupees per quintal in khndesh Published on: 13 January 2022, 05:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters