1. बातम्या

MFOI Award 2023: देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून राजाराम त्रिपाठी यांचा सन्मान

दिल्लीत पार पडत असलेल्या 'मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023' प्रायोजक बाय महिंद्रा ट्रॅक्टर कार्यक्रमाला आज (दि.८) केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला उपस्थित होते. यावेळी भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी राजाराम त्रिपाठी (छत्तीसगड) आणि रत्नम्मा गुंडमंथा (कर्नाटक) यांना केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील सर्व श्रीमंत शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर या शेतकऱ्यांना कृषी जागरण आणि महिंद्रा ट्रॅक्टरकडून ब्राझील दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याठिकाणी या शेतकऱ्यांना शेतीतील संपूर्ण नवनवीन मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
MFOI Award 2023

MFOI Award 2023

Millionaire Farmers of India Award 2023 Sponsored by Mahindra Tractor : दिल्लीत पार पडत असलेल्या 'मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023' प्रायोजक बाय महिंद्रा ट्रॅक्टर कार्यक्रमाला आज (दि.८) केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला उपस्थित होते. यावेळी भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी राजाराम त्रिपाठी (छत्तीसगड) आणि रत्नम्मा गुंडमंथा (कर्नाटक) यांना केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील सर्व श्रीमंत शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर या शेतकऱ्यांना कृषी जागरण आणि महिंद्रा ट्रॅक्टरकडून ब्राझील दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याठिकाणी या शेतकऱ्यांना शेतीतील संपूर्ण नवनवीन मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

कोण आहेत राजाराम त्रिपाठी?
डॉ.राजाराम त्रिपाठी हे छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ते शेती करत आहेत. आज आपल्या मेहनतीमुळे औषधी पिकांच्या लागवडीतून कोट्यवधींची उलाढाल ते करतात. राजाराम त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांचे आजोबाही शेतकरी होते आणि ते शेतीत कष्ट करायचे. पण, त्यांनी शेतीत नेहमीच तोटा पाहिला. त्यामुळे त्यांच्या मनात नेहमीच एक तळमळ असायची की शेतीतून चांगला नफा का मिळवता येत नाही? शेतकरी लाखपती-करोडपती का होऊ शकत नाहीत? या सर्व प्रश्नांनी त्यांना शेती करण्याची प्रेरणा दिली आणि त्यांनी नोकरी सोडून शेतीचा मार्ग स्वीकारला.

ते म्हणाले की, शेती करण्यापूर्वी अनेक नोकऱ्या केल्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एसबीआयच्या माध्यमातून महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर ग्रामीण बँकेत व्यवस्थापक म्हणून काम केले. पण, त्यांना शेतीची नितांत आवड होती. आजोबांनी ५ एकर जमीन विकत घेऊन शेती सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हापासून त्यांचे संपूर्ण कुटुंब शेती करत आहे.

1100 एकर जमिनीवर मी वैयक्तिक शेती करतो असे त्यांनी सांगितले. पण, यशस्वी शेतकरी होण्यासाठी जेव्हा त्यांनी परदेशात प्रवास केला तेव्हा त्यांना आढळले की, परदेशात शेती हा मोठा व्यवसाय आहे आणि तेथील शेतकरी 10-10 हजार एकरांवर शेती करतात. त्यानंतर त्यांना एक गोष्ट समजली की त्याचे गंतव्य अजून दूर आहे आणि त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांनी परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही आपल्यासोबत जोडले आणि आज सर्व शेतकरी मिळून सुमारे एक लाख एकरवर शेती करत आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे.

25 कोटींची वार्षिक उलाढाल -
ते म्हणाले की ते दरवर्षी 25 कोटी रुपयांची उलाढाल करतात. त्याच बरोबर त्यांच्याशी निगडित शेतकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण शेतकरी समूह दरवर्षी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. कृषी जागरणच्या माध्यमातून त्यांनी इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करून रसायनांवरचे अवलंबित्व सोडण्याचा संदेश दिला. चांगले अन्न खाल्ले तरच आपण निरोगी राहू, असेही राजाराम त्रिपाठी म्हणाले. त्यामुळे विषमुक्त आणि फायदेशीर शेती करा. बाजारावर आधारित शेती करा, जेणेकरून लोकांसोबतच शेतकऱ्यांनाही फायदा होईल. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारत सरकारचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तीनवेळेस मिळाला आहे.

"देशातील शेतकरी हे देशाच्या हृदयाचे ठोके आहेत, ज्यांच्याशिवाय राष्ट्रीय अर्थव्यवस्था चालू शकत नाही. सकल देशांतर्गत उत्पादनात शेतीचे महत्त्वाचे योगदान महत्त्वाचे आहे. देशात शेतकऱ्यांना पेक्षा आजकाल व्यापारी श्रीमंत होताना दिसत आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे. तसंच आगामी काळात शेतकऱ्यांनी शेतीतील बदल ओळखून त्यात बदल केला पाहिजे. शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजे. देशातील काही शेतकरी श्रीमंत होताना दिसत आहेत पण जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी श्रीमंत झाला असे म्हणता येईल "
एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
"'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये देशभरातून शेतकरी आले आहेत. यात महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचा अधिक समावेश दिसून आला. तसंच आपला शेतकरी पिकवत आहे पण त्यांना अजून विकता येत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक सक्षम होता येत नाही. जेव्हा शेतकरी आर्थिक सक्षम होईल तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी श्रीमंत होईल. आशा आहे की आगामी काळात सर्व शेतकरी श्रीमंत झालेले असतील."
शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
English Summary: Rajaram Tripathi honored as the richest farmer in the country Published on: 08 December 2023, 11:59 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters