1. बातम्या

पीक विमा भरण्यासाठी महाराष्ट्राला केवळ 3 दिवसांची मुदतवाढ, इतर राज्यात 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्याने शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
crop insurance (image google)

crop insurance (image google)

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्याने शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने पीक विम्याची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. 31 जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यामध्ये बदल करुन तीन ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pik Vima) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे.

असे असताना केंद्राने मध्य प्रदेश, छत्तीसड, मनिपूर आणि गोव्याला १५ ते १६ दिवसांची मुदतवाढ दिली. तर महाराष्ट्राला केवळ ३ दिवसांची मुदतवाढ दिली होती. मात्र हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी या राज्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली. केंद्राच्या या भुमिकेवरून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनो शिमला मिरची शेती करणार असाल तर जाणून घ्या रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय

त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) अर्ज केला नाही, त्या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज भरावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा (Pik Vima) भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली.

आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार

अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती.

मोठी बातमी! शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील बीआरएसच्या पक्षात दाखल...
शेतकऱ्यांनो पीक विमा अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी..

English Summary: Only 3 days extension for Maharashtra to pay crop insurance, extension till August 16 in other states Published on: 03 August 2023, 10:20 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters