MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

लाखोंचा पोशिंदा अडचणीत, नियम बाजूला ठेवून मदत करा, आता करायचे काय अजितदादांनी दिला सल्ला

सध्या राज्यात अणेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या पुरग्रस्तांचा दौरा केला. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन (Crop Damage) पीक नुकसानीची पाहणी करीत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmar help ajit pawar

farmar help ajit pawar

सध्या राज्यात अणेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या पुरग्रस्तांचा दौरा केला. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन (Crop Damage) पीक नुकसानीची पाहणी करीत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याशिवाय नुकसानीची दाहकता ही लक्षात येत नाही, पावसामुळे केवळ शेतीचेच नुकसान झाले असे नाही तर घरांचीही पडझड झाली आहे. नुकसानीची तीव्रता पाहता नियम-अटी बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

यामुळे आता सरकार काय मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच ते म्हणाले, हा दौरा केवळ शेतकऱ्यांसाठी आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही. असे असतानाही कोणी प्रश्न उपस्थित केले तर त्यांना मात्र, जशाच तसे उत्तरही दिले जाईल असेही त्यांनी प्रवीण दरेकर यांना सुनावले आहे. प्रवीण दरेकरांनी या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली होती.

पिक्चर अभी बाकी है! उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, कारण..

बांधावरची स्थिती ही वेगळी असून त्वरीत मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नुकसानीचे स्वरुप एवढे मोठे आहे की, सरकारने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियम बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांचा मोडून पडलेला संसार पु्न्हा उभा राहणार आहे, असेही ते म्हणाले.

वाईमध्ये ढगफुटीदृश्य पाऊस, शेतकऱ्यांसह घरांचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत कमी कालावधी उत्पादन पदरी पड़ेल असेही बियाणे असते. त्यामुळे त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असा सल्ला अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पहिल्या पेऱ्यातील पिकांचे नुकसान झाले असल्याने आता अधिकचा वेळ आणि पैसा खर्चून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

महत्वाच्या बातम्या;
राज्यातील बड्या राजकीय नेत्यांना धक्का, साखर आयुक्तांनी पैसे थकवल्याप्रकरणी दिल्या नोटीस..
शेतकऱ्यांनो गाजर गवताचा करा कायमचा नायनाट, जाणून घ्या सोप्पी पद्धत..
शेतकऱ्यांनो जनावरांची काळजी घ्या! 4 दिवसात 30 जनावरांचा मृत्यू

English Summary: Lakhs of Poshinda trouble, leave aside rules help, Ajit Dada advised Published on: 30 July 2022, 05:49 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters