1. बातम्या

बिहार सरकारला जमल मग महाराष्ट्र सरकारला का नाही? गोदामासाठी 9 लाखांचे अनुदान, शेतकऱ्यांना 'असा' होतो फायदा..

बिहार सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. नुकतेच सरकारने जाहीर केले आहे की शेतकरी आता अन्नधान्य उत्पादन करू शकतील आणि ते सुरक्षितपणे साठवू शकतील.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmar

farmar

बिहार सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. नुकतेच सरकारने जाहीर केले आहे की शेतकरी आता अन्नधान्य उत्पादन करू शकतील आणि ते सुरक्षितपणे साठवू शकतील. अन्नधान्य साठवणुकीबाबत शासन निर्णय घेतल्यानंतर या विशेष कामासाठी कृषी विभागाकडून पुढाकार घेतला जाणार आहे. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे ५ ते ९ लाख रुपयांचे अनुदान धान्य गोदामे बांधण्यासाठी दिले जाणार आहे.

या योजनेसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि हरित क्रांती उपयोजनेअंतर्गत निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मिळणार आहे. याशिवाय बिहार सरकार शेतकरी उत्पादन संस्था, शेतकरी गट आणि महिला गटांनाही अनुदान देणार आहे. या सर्व योजनांमध्ये दिलेल्या अनुदानाच्या रकमेवर आरक्षणाची तरतूद लागू होणार आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

उदाहरणार्थ हे आरक्षण एससी, एसटी आणि महिला शेतकऱ्यांना लागू असेल. या योजनेत पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या विषयाबाबत कृषी विभाग नकाशाही तयार करणार आहे. शेतकरी असाल आणि तुमच्या धान्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी गोदाम बांधायचे असेल तर तुम्हीही सरकारच्या या योजनेचा सहज लाभ घेऊ शकता. इतर सर्व योजनांप्रमाणे, तुम्ही या योजनेसाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता आणि तुम्हाला अर्जाचे प्रतिज्ञापत्र देखील भरावे लागेल.

राज्यातील 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. जेणेकरून राज्यातील धान्याचा साठा सुरक्षित ठेवता येईल. राज्यात या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी विभागाने सर्व जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि गट कृषी अधिकाऱ्यांना शहरापासून गावात प्रचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना केव्हाही आपला माल विकता येणार आहे. महाराष्ट्रात देखील असे अनुदान दिले गेले तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील आणि त्यांना चार पैसे देखील मिळतील.

English Summary: If Bihar government is united then why Maharashtra government is not? Grant of Rs. 9 lakhs for godown, benefits to farmers. Published on: 12 March 2022, 03:58 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters