1. बातम्या

एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब गरजेचा : राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांना मुबलक व माफक दरात वीजपुरवठा कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री कृषी सौर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे.

KJ Staff
KJ Staff


अहमदनगर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांना मुबलक व माफक दरात वीजपुरवठा कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री कृषी सौर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. लवकरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून शेतकरी व विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी शेती करायला हवी, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

जेऊर व परिसरातील वाड्यावस्त्यांवर कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ना. तनपुरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, जि. प. सदस्य गोविंद मोकाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, संजय मेहेत्रे, संजय मेचकर, बहिरवाडीचे सरपंच विलास काळे, राजू दारकुंडे, संजय आवारे, दत्तात्रय आवारे, दत्ता म्हस्के, डॉ. अजय मगर, दिगंबर मगर, बाळासाहेब मगर, संजय ससे, रामदास ससे, दत्तात्रय म्हस्के, बाळासाहेब मोकाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

English Summary: farmer should try for integrated farming - minister tanpure Published on: 08 July 2020, 06:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters