1. बातम्या

वसुलीला सरकारचा ससा होतो आणि शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली तर कासव, देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका

राज्य शासनाने मार्च,एप्रिल आणि मे2021 मध्ये झालेल्या नुकसानीचा जी आर 6 ऑक्टोबर 2021 ला काढला यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
devendar fadnvis

devendar fadnvis

 राज्य शासनाने मार्च,एप्रिल आणि मे2021 मध्ये झालेल्या नुकसानीचा जी आर 6 ऑक्टोबर 2021 ला काढला यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी एकरी 50 हजार रुपयांची मागणी करणारे सरकार आता मदतीसाठी हात का आखडता घेत आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती मालाचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

राज्य सरकारने जुलै 2021 च्या मदतीची भरघोस घोषणा केली आहे.. यामध्ये नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून फक्त दहा कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून फक्त एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.म्हणजेनाशिक विभागातील एका जिल्ह्याच्या वाट्याला वीस हजार रुपये मदत करण्यात आल्यामुळे फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

 शेतकऱ्यांना मदतीच्या वेळी सरकारचा होतो कासव

 

 वसुलीसाठी धावणारे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय आला की महा विकास आघाडी सरकारचा कासव होतो. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. परंतु सहा ते आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

English Summary: devendra fadanvis criticize on state goverment on compansation package Published on: 09 October 2021, 09:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters