1. बातम्या

Crop Insurance : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाईची अग्रीम रक्कम, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Crop Insurance :- सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडला असून खरिपातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या कालावधीमध्ये पिकांवर विपरीत परिणाम होऊन येणाऱ्या काळात उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्तीत जास्त बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेल्या आहेत. अजून देखील पावसाची चिन्हे नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्व दूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
crop insurance update

crop insurance update

 Crop Insurance :- सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडला असून खरिपातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या कालावधीमध्ये पिकांवर विपरीत परिणाम होऊन येणाऱ्या काळात उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्तीत जास्त बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेल्या आहेत. अजून देखील पावसाची चिन्हे नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्व दूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

परंतु तोपर्यंत खरिपाच्या पिकांची स्थिती अतिशय वाईट होण्याची शक्यता आहे. याचा अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे अशा शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबीअंतर्गत संभाव्य विमा भरपाईतून 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्याच्या बाबतीत राज्यातील काही ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या असून त्याच बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट परभणी जिल्ह्यासाठी समोर आली आहे.

 परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यातील 11 मंडळांमध्ये 21 ते 22 दिवसाचा सलग पावसाचा खंड

 या हंगामातील 29 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पालम, जिंतूर आणि पूर्णा या सात तालुक्यातील जवळजवळ 11 मंडळांमध्ये सलग 21 ते 22 दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे सोयाबीनच्या या हंगामाच्या उत्पादनामध्ये मागील सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत तब्बल 64 ते 67% पर्यंत घट अपेक्षित आहे.

त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम अंतर्गत सोयाबीन पिकाकरिता ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य विमा भरपाई रकमेतून 25% आगाऊ रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा पिक विमा योजना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी 25 ऑगस्टला अधीसूचना काढून विमा कंपनीला दिले आहेत.

पाहणी अहवाल सादर

 पिक विमा योजनेच्या मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार आता परभणी जिल्ह्यातील अधिसूचित विमा क्षेत्र या घटकातील सोयाबीन या अधिसूचित पिकाच्या पिक परिस्थिती अहवाल तसेच पर्जन्यमान अहवाल,

स्थानिक प्रसार माध्यमांचे वार्तांकन तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थिती इत्यादी प्रातिनिधिक सूचकांच्या आधारावर आता राज्य शासनाच्या अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला आहे व या पाहणीमध्ये सिंगणापूर,दैठणा, जिंतूर तसेच सेलू, मानवत तालुक्यातील केकरजवळा, पाथरी, बाभळगाव, पालम तालुक्यातील रावराजुर, पेठ शिवणी आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस आणि लिमला या अकरा मंडळातील सोयाबीनचे जे काही अपेक्षित उत्पादन आहे ते मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनांच्या तुलनेत 50% पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. 

त्यामुळे आता आयसीआयसीआय लोम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्या कंपनीने ही अधीसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे अशा सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

English Summary: Crop Insurance: Farmers in this district will get advance amount of insurance compensation Published on: 28 August 2023, 09:07 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters