1. बातम्या

उद्दिष्ट पूर्ण झाल्याने एफसीआय मार्फत हरभरा खरेदी थांबली, राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा हरबरा पडून

हमीभाव केंद्राकडे हमीभाव खरेदी करण्यासाठी २९ मे पर्यंत मुदत आहे. मात्र, उद्दिष्ट गाठल्याने नाफेड व एफसीआयमार्फत हरभरा खरेदी २३ मे रोजी अचानक बंद करण्यात आली आहे. २९ मे रोजी ही खरेदी बंद होणार होती, मात्र कोणतीही सूचना न देता बंद केल्यामुळे शेतकरी तसेच नाफेड हमी खरेदी केंद्र संचालकांमध्ये नाराजी आहे.

completion  target, purchase of gram through FCI  stopped, thousands of farmers

completion target, purchase of gram through FCI stopped, thousands of farmers

हमीभाव केंद्राकडे हमीभाव खरेदी करण्यासाठी २९ मे पर्यंत मुदत आहे. मात्र, उद्दिष्ट गाठल्याने नाफेड व एफसीआयमार्फत हरभरा खरेदी २३ मे रोजी अचानक बंद करण्यात आली आहे. २९ मे रोजी ही खरेदी बंद होणार होती, मात्र कोणतीही सूचना न देता बंद केल्यामुळे शेतकरी तसेच नाफेड हमी खरेदी केंद्र संचालकांमध्ये नाराजी आहे.

महाराष्ट्रात हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. विदर्भात विशेष करून जास्त उत्पन्न होते याचे कारण चांगले हवामान आणि कमी पाण्याचे क्षेत्र आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हरभरा पिकाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. कारण नाफेडच्या वतीने हमी भावाने हरभरा खरेदी केला जातो. त्यामुळे हरभरा पिकाची किंमत अगोदरच ठरलेली असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो.

यंदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादकांनी हरभरा विक्रीसाठी नाफेड केंद्राकडे नोंदणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण १४ हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी करताना नाफेकडून शेतकऱ्यांना २९ मेपर्यंत हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  

मात्र, नाफेड हमी खरेदी केंद्राच्या संचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा सूचना न देता अचानक उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने नाफेड खरेदीचे संकेतस्थळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी हरभरा विक्री विना राहिले आहेत.

नाफेडचे खरेदी केंद्र बंद झाल्याने या शेतकऱ्यांना आता स्थानिक बाजारपेठेत अल्प किमतीत हरभरा विकावा लागणार आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नुकसान भरपाई देण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. राज्य व केंद्र सरकारने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे आणि हक्काविना राहिलेला सर्व हरभरा खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आता केली आहे.

महत्वाच्या बातम्या
दीड कोटींचे बक्षीस,सगळ्यांना जेवण, बैलांची तपासणी; रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

Aadhar Card Lost: आधार कार्ड हरवलं तरी डोन्ट वरी; 'या' पद्धतीने घरबसल्या मिळवा दुसरं आधार कार्ड; वाचा 

English Summary: completion target, purchase of gram through FCI stopped, thousands of farmers Published on: 27 May 2022, 04:42 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters