1. बातम्या

शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट! औरंगाबादमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
committed suicide

committed suicide

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

यामध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नावं आहे.

दिनकर बिसनराव बिडवे या शेतकऱ्याने शेतातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (10 सप्टेंबर) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान उघडकीस आली. त्यांनी शेतातील राहत असलेल्या घरात रविवारी दुपारी आत्महत्या केली. याची माहिती पोलिस पाटील प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात दिली.

यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये, राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन...

दिनकर यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. तसेच पीरबावडा येथील शेतकऱ्याने विषारी औषध घेतले होते. तर, औरंगाबादच्या घाटी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. पावसाअभावी वाया गेलेल्या पिकाच्या नैराश्यान आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार मालामाल, सरकार 65% खर्च उचलणार

वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद मतसागर यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या अरविंद यांनी शनिवारी विषारी औषध सेवन केले होते.

पावसाची पुन्हा एकदा विश्रांती, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत, जाणून घ्या या आठवड्याचा हवामान अंदाज...

English Summary: Bad situation for farmers! Three farmers committed suicide in Aurangabad on the same day Published on: 11 September 2023, 01:50 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters